Water Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project : पेण तालुक्यातील बाळगंगा धरणग्रस्तांच्या नशिबी यातना

धरणाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

Team Agrowon

Pen News : तालुक्यातील बाळगंगा धरणाच्या कामाला १२ वर्ष पूर्ण होत आली आहेत, तरीही धरणाचे काम पूर्णत्‍वास गेलेले नाही. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाळगंगा धरणाच्या संदर्भात आवाज उठविला जाणार असल्याची खात्री येथील प्रकल्पग्रस्तांना होती.

मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने धरणाचे काम कधी पूर्ण होणार, पाणीटंचाईची समस्‍या कधी मार्गी लागणार, असे प्रश्‍न प्रकल्‍पग्रस्‍तांकडून विचारण्यात येत आहे.

तालुक्यातील जावळी, निधवली या भागातील जवळपास १२ महसूल गावे व १३ आदिवासी वाड्या तर ६ मोठ्या ग्रामपंचायतीतील तीन हजारांहून अधिक कुटुंबे बाळगंगा धरणामुळे बाधित होत आहेत.

आजतागायत या धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम अद्याप बाकी आहे. धरणाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

प्रकल्पग्रस्तांनी आधी पुनर्वसन, मग धरण याकरिता अनेक आंदोलने केली, मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

बाळगंगा धरणासाठी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भूखंड वाटप, घरांच्या किमती, पुनर्वसन आराखडा हे सर्व प्रश्न आजपर्यंत सुटले नसल्याने दिवसेंदिवस या भागाच्या समस्या अधिकच जटिल होत आहेत.

गावांतील रस्त्याची दैना झाली असून या खोऱ्यातून येणाऱ्या अनेक विद्यार्थी, आदिवासी बांधव, महिला वर्ग, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT