Sangli News : मागील काही वर्षांपासून वाळवा तालुक्यात खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. शिवाय उन्हाळी हंगामात देखील बियाणांसाठी पेरणी केली जात होती.
परंतु गेल्या तीन वर्षांपासून उत्पादनात झालेली घट व बाजारात सातत्याने होत असलेली भावातील घसरण यामुळे यंदा तालुक्यात रब्बी हंगामात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याची माहिती कृषी विभागाच्या पेरणी अहवालातील आकडेवारीवरून दिसून येते. दुसरीकडे, नगदी पीक म्हणून रताळे लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.
बाजारात दर घसरल्याने शेतकरी सोयाबीनच्या पेरणीबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच लागवड क्षेत्र घटले आहे. यंदा साखर कारखाने नेहमीपेक्षा एक महिना उशिरा सुरू झाले. पर्यायाने ऊस गळितास उशिरा गेला. त्यामुळे शेतजमीन लवकर तयार झाली नाही. उलट रताळे पिकास बऱ्यापैकी दर मिळत असल्याने उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी यावर अधिक भर दिला आहे.
काहींनी हिरवळीच्या खतावर भर दिला आहे. सोयाबीनच्या पडलेल्या दराचा फटकान लागवडीला बसला आहे. दोन वर्षांपूर्वी वाळवा तालुक्यात १०० हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन लागवडीचा पथदर्शी प्रयोग झाला होता. शासनाने हमीभाव ठरवून दिला. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी मनमानी करून कमी दराने सोयाबीन खरेदी केले, यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. या सर्वांचा परिणाम उन्हाळी सोयाबीन लागवडीवर झाला आहे.
मागील काही वर्षांत वाळवा तालुक्यात उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकरी करीत होते. यावर्षी मात्र उन्हाळी लागवड झालेली नाही.- इंद्रजित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी वाळवा-इस्लामपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.