Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : पुरेशा पावसाअभावी खानदेशात पेरण्या रखडत

Sowing Update : खानदेशात काही भागांत पाऊसमान बरे आहे. तर काही भागांत तुरळक, अल्प पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झालेली नाही.

Team Agrowon

Jalgoan News : खानदेशात काही भागांत पाऊसमान बरे आहे. तर काही भागांत तुरळक, अल्प पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. पाऊस सर्वत्र येईल, असे भाकित करण्यात आले होते. परंतु खानदेशात सर्वत्र पाऊस नाही.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जामनेर आदी भागात पाऊस बरा आहे. परंतु जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर भागात पाऊस हवा तसा नाही. रावेर, यावलमध्ये मध्यम पाऊस मागील दोन दिवसांत झाला आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा भागातही पाऊस कमी आहे. नंदुरबारातील शहादा, नंदुरबार, तळोदा भागातही कमी पाऊस आहे. या भागात शेती पेरणीसाठी तयार आहे. पूर्वमशागत झाली आहे. परंतु हवा तसा पाऊस न आल्याने या भागात पेरणी रखडत सुरू आहे.

खानदेशात एकूण १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी होईल. त्यात जळगाव जिल्ह्यात सात लाख ६५ हजार हेक्टर, धुळ्यात चार लाख हेक्टर आणि नंदुरबारात सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी अपेक्षित आहे. यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाईल. कापसाची लागवड ८ लाख ३५ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. यातील पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड पूर्ण होत आली आहे.

अद्याप खानदेशात फक्त १५ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाची सुमारे एक लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. नंदुरबारातील शहादा तालुक्याच्या पूर्व भागात पाऊसमान कमी आहे. या भागात जलसाठे कमी झाले असून, बागायती पिके जगविताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

गिरणा पट्ट्यात पेरणी

गिरणा पट्ट्यात पूर्वमोसमी पाऊसही आला. तसेच मागील दोन-तीन दिवसांतही पाऊस झाला आहे. पाचोरा व अन्य भागांत चांगला पाऊस झाल्याने गिरणा नदीला प्रवाही पाणी आले आहे. यामुळे पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव आदी भागांत पेरणी सुरू झाली आहे. कोरडवाहू कापूस, तूर, कडधान्य पिकांची पेरणी सुरू आहे. सोयाबीनची पेरणी मात्र या भागात सुरू झालेली नाही.

खानदेशात यंदा कापसापाठोपाठ तृणधान्य पिकांची पेरणी अधिक होईल. त्यात मक्याची लागवड सर्वाधिक एक लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. मका लागवडदेखील अद्याप गतीने सुरू नाही. कारण मक्याचे बियाणेदखील महाग आहे. चार किलो बियाणे १५५०, १२०० ते ११०० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचे बियाणेदेखील महाग असून, ३० किलो बियाणे चार हजार रुपयांना मिळत आहे. महाग बियाणे चांगला पाऊस आल्याशिवाय न पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT