Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Abhiyan : दुष्काळावर मात करण्यासाठी बुलडाण्यात गाळमुक्त मोहीम

Water Conservation : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये गाळमुक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून जिल्ह्यातील तलाव, नदी, धरण गाळमुक्त होणार आहे.

महाराष्ट्राला पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी व ‘सुजला सुफला’ होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही योजना युद्ध पातळीवर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासाठी वेगळ्या निधीची राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवली आहे. लहान मोठे धरण, नाले, नद्या, यामधील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाचे वतीने ठीक ठिकाणचे धरणातील गाळ काढण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.

या लोकोपयोगी अभियानाने राज्यातील तलाव, नदी नाले गाळमुक्त होणार आहेच. २७ फेब्रुवारी रोजी या गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मृद व जलसंधारणाचे संबंधित अभियंता यांनी जे अंदाजपत्रक तयार केलेले आहे त्यांची सविस्तर माहिती देण्यात दिली.

यामध्ये सद्यःस्थितीत विविध १०९ लहान मोठ्या धरणांतील गाळ काढण्याचे निश्चित केले असून प्रत्यक्षात ३२ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. उर्वरित कामाचे कार्यारंभ आदेश दोन दिवसांत देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गाळ काढणे अपेक्षित आहे, त्या ग्रामपंचायतीने याची माहिती मृद व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकाऱ्यांकडे देण्याबाबत आवाहन करण्यात आले.

बीजेएसचे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन, सुजलाम सुफलामचे राजेश देशलहरा, पश्चिम विदर्भ अध्यक्ष कीर्तीकुमार वायकोस, जिल्हाध्यक्ष मंगलचंद कोठारी, सुजलाम सुफलामचे जिल्हाध्यक्ष विनोद सुराणा पीयूष खडकपूरकर, मुन्ना बेगानी उपस्थित होते.

शासनाचा तीन संघटनांशी करार

महाराष्ट्र शासनाने हे काम करण्यासाठी भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन व टाटा ट्रस्टसमवेत सामंजस्य करार (MOU) केलेला आहे. यामध्ये लहान मोठी धरणे नद्या-नाले यातील गाळ काढून सिंचन क्षमता वाढवण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात सर्वप्रथम या गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्याचे दृष्टीने भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत संबंधित यंत्रणा प्रमुखांसमवेत बैठक बोलावण्याचे सुचविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT