Padmashri Award Agrowon
ॲग्रो विशेष

PadmaShri 2025: पर्यावरणपूरक शेतीचे प्रणेते सुभाष शर्मा यांना ‘पद्मश्री’

Subhash Sharma: यवतमाळ जिल्ह्यातील सुभाष शर्मा यांनी पर्यावरणपूरक शेतीचे अभिनव तंत्र विकसित करत नैसर्गिक शेतीला राष्ट्रीय पातळीवर नेले. त्यांच्या या कार्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News: पर्यावरणावर आधारित नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष शर्मा यांचा मंगळवारी (ता.२७) दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य मंत्री व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या सुभाष खेतूलाल शर्मा यांनी पर्यावरणावर आधारित शेतीपद्धतीचे अभिनव असे मॉडेल विकसित केले आहे. शिवारात मित्र किडींचा वावर वाढावा याकरिता त्यांनी रासायनिक फवारणी बंद केली. त्यासोबतच पक्ष्यांच्या माध्यमातून कीड नियंत्रण प्रभावी होते, ही बाब लक्षात घेता बांधावर तसेच शेताच्या विविध भागांत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे.

या झाडांचा उपयोग पक्षी थांब्यासारखा होतो. त्यासोबतच शेतात जिवाणूंचे प्रमाण वाढावे यावरही त्यांनी भर दिला आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्ब गरजेचा असतो. तो वाढल्यास सुपीकता आणि पर्यायाने उत्पादकता वाढते, या अनुभवातून त्यांनी अनेक व्यापक उपायांवर भर दिला आहे. एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता देखील ते शिवारातील विविध घटकांच्या बळावरच करतात, असा दावा त्यांनी केला आहे.

त्यामुळे बाजारातील महागड्या निविष्ठांवर अवलंबून राहावे लागत नाही. पर्यायाने उत्पादकता खर्चात मोठी बचत होते. शाश्‍वत शेतीसाठी अशा प्रकारच्या पॅटर्नचा अवलंब वाढला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केली. रासायनिक घटकांचा वापर करून उत्पादित केलेल्या शेतीमालाचा आहारात वापर केल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी देखील नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतीमालाचाच आग्रह धरावा, असे आवाहन श्री. शर्मा यांनी केले.

राज्यातील या मान्यवरांचा सन्मान

सुभाष शर्मा यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांना (मरणोत्तर) पद्मभूषण, तर अशोक सराफ, अच्युत पालव, आश्‍विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्‌मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

‘ॲग्रोवन’चे मोठे योगदान

‘‘पर्यावरणवादी नैसर्गिक शेतीच्या प्रसारात ‘ॲग्रोवन’चे मोठे योगदान राहिले आहे. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातूनच हे तंत्रज्ञान राज्य व देशपातळीवर पोहोचले. त्यामुळे या सर्वोच्च पुरस्कारात ‘ॲग्रोवन’चे योगदान नाकारता येणार नाही,’’ अशी भावनिक प्रतिक्रिया सुभाष शर्मा यांनी दिली.

ज्ञान, योजकता आणि श्रम हे शेतीचे मूलभूत सिद्धांत आहेत. माती, पाणी, पर्यावरण या घटकांचे संवर्धनातून उत्पादकता वाढ होणार आहे. त्यामुळे या घटकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून येत्या काळात शासनाच्या सहकार्यातून या शेतीपद्धतीच्या प्रसारावर भर राहील.
सुभाष शर्मा, पदमश्री, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT