Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Water Shortage : महिलांना एक किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते आहे. दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Washim News : तालुक्यातील खैरखेडा गावात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महिलांना एक किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते आहे. दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पूरवून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांनी केली आहे.

आदिवासी व बंजारा समाज बहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावाचा संपूर्ण भुभाग खडकाळ डोंगर-दऱ्या व कडाकपारींनी वेढलेला आहे. गावात पाचशे फुटांवर कूपनलिका घेऊनही त्याला पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नसल्याने या गावात सार्वजनिक तथा खासगी स्वरूपाची एकही कूपनलिका किंवा पाणवठा नाही.

गावात एकही हातपंप वा पाणवठा नसलेले बहुदा हे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे. त्यामुळे या गावातील जनतेची तहान उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच दूषित पाण्यावर भागवावी लागते. बरेचदा नदीपात्रातील डोहावरून पाणी भरले जाते.

दुषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याचे वास्तव आहे. महिलांना धुणे धुण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील नदी पात्रातील डोहावर भर उन्हात जावे लागते.

पाच वर्षांपूर्वी शासनाने मोठा खर्च करून गावासाठी जलस्वराज्य योजनेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत केली. परंतु या योजनेच्या स्रोताला पाणी नसल्याने ती योजना अयशस्वी ठरली. आबालवृद्धांना भर उन्हात पाण्यासाठी दाही दिशा पायपीट करावी लागते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पिक विमा योजनेतील बदलांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांचा दावा

Sugarcane Farming Crisis: तेलंगणात ऊस शेती संकटात, पीक क्षेत्र १० लाखांवरून ३५ हजार एकरावर, शेतकरी भात पिकाकडे वळले

Sports Legacy: येथे घडतात कबड्डीपटू...

Panchayati Raj: ग्राम विकासामध्ये ‘फीडर केडर’ आवश्‍यक

Natural Farming: नैसर्गिक शेतीसमोरील वास्तविक आव्हाने

SCROLL FOR NEXT