Unseasonal Rain : राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे, अशी टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कांदा, फळबागांचं गारपीटीने नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. सरकार पंचनामे करू म्हणतं. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषावर मदत करू म्हणतं पण शेतकऱ्यांना मदत मिळत नाही.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलता दिली.
राज्यातील शेतकरी मागील चार महिन्यापासून अस्मानी संकटाला तोंड देत आहे. वादळी पावसाने अनेक भागात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. त्यात शेतीमालाचे भावही दबावात आहेत.
सहकार कायद्यात भाजपच्या फायद्यासाठी बदल
सहकार अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.३०) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट करणारा हा बदल असल्याचे सांगण्यात आले.
यावर अजित पवार यांनी भाजपच्या जवळच्या कारखानदारांना फायदा करण्यासाठी असे निर्णय घेतले जात असल्याची टीका केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.