Rajaram Sahkari Sakhar agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sahkari Sakhar : राजाराम साखर कारखान्यावरून सतेज पाटील पुन्हा मैदानात, विरोधात कारभार केल्याचा आरोप

sandeep Shirguppe

Satej Patil VS Amal Mahadik : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून विरोधी गटाच्या सभासदांचा ऊसच तोडून नेला जात नसल्याचा जाब विचारण्यासाठी राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आज मंगळवारी (दि. २) धडक दिली.

दरम्यान यावरून पुन्हा सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. सभासदांचा ऊस नेत नसल्याच्या कारणावरून आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. निवडणूक झाल्यानंतर राजाराम कारखान्यात सभासदांच्या हिताच्या विरोधात कारभार सुरु आहे.

आजच्या घडीला जिल्ह्यात उसाची कमतरता आहे. रोज राजाराम कारखाना दोन तास बंद असतो. मात्र सभासदांचा ऊस कारखाना उचलत नाही. निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जात आहे. बी आर माने यांच्या पावतीसमोर विरोधक लिहिल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.

जे विरोधक आहेत त्यांचा ऊस घेऊन जायचं नाही असले षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्याचा निषेध करून साकुर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. तीन वर्ष उस नेला नसल्यास पोटनिमानुसार सभासद व रद्द होते. विरोधक सभासद संपवण्याचा डाव सत्ताधारी आखत असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.

आठ दिवसात सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा सभासदांना घेऊन कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतीश पाटील यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT