Sambhajiraje Chhatrapati Agrowon
ॲग्रो विशेष

Sambhajiraje Chhatrapati : व्हॉट्सअँप फेसबुकद्वारे आवाहन करण्यापेक्षा कृषीमंत्र्यांनी ग्राउंडवर येऊन काम करावं : संभाजीराजे छत्रपतींचा संताप

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात बोगस बी-बियाणांची राजरोस विक्री होत असून खते बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक केली जात आहे. अशा वेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ग्राउंडवर येऊन काम करणं अपेक्षित होतं. मात्र व्हॉट्सअँप फेसबुकद्वारे कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन केले. जे योग्य नव्हते, असे म्हणत स्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच खते बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक करमाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असतानाही सरकारचे, राज्यकर्त्यांचे याकडे लक्ष नसल्याची टीका संभाजीराजे यांनी केली आहे. बोगस बी-बियाणे आणि खतांच्या संदर्भात कृषीमंत्र्यांनी जाहीर केलेल्या व्हॉट्सअँप नंबरवरून देखील संभाजीराजे यांनी निशाना साधला आहे.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, कृषीमंत्र्यांनी अशाप्रकारे व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रारी मागून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. याची शक्यता वाटत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. एकीकडे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. तर कृषीमंत्री व्हॉट्सअँप फेसबुकद्वारे तक्रार करा, असे आवाहन करत आहेत. हे योग्य नाही. राज्यात २६६ रूपयांची खताच्या गोणीची किंमत ८०० रूपयांवर गेली आहे. अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना लुटले जात असताना कृषी विभाग झोपा काढत आहे का? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

संभाजीराजे म्हणाले, राज्यात होणाऱ्या या लूटीबाबत स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकरी हेल्पलाईन सुरू केली होती. या हेल्पलाईनवर राज्याच्या विविध भागातील अनेक शेतकऱ्यांनी खते, बी बियाणे, युरिया चढ्या दराने विक्री केली जात असल्याची तक्रार केल्या. त्याप्रमाणे पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील असणाऱ्या खत विक्री दुकानात शहानिशा केली. येथे २६६ रूपयांची खताची गोणी तब्बल ८०० विकली जात असल्याचे उघड झाले आहे. एमआरपीपेक्षा जवळपास तिप्पट दराने खतांची विक्री केली जात आहे.

याबाबत गेल्या महिन्यातच पक्षाच्या वतीने राज्याच्या कृषी आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून जून्या दराने खतांची पूर्तता करा, अशी मागणी केली आहे. तसेच बोगस खते व बियाणे याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे संभाजीराजे म्हणाले

मात्र २ दिवसांत कृषी आयुक्तांची बदली करण्यात आली. आता राज्याला कृषी आयुक्त नाहीत. ही अतिशय धक्कादायक बाब असून शेतकऱ्यांची लूट, फसवणूक करणाऱ्यांवर राज्य सरकारनं तातडीने कार्यवाही करावी असे संभाजीराजे म्हणाले. तसेच मागील वर्षीच्या दुष्काळातील विमा अग्रीम आणि विम्याची रक्कम अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ती देखील मिळावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT