Buldhana News : सोयाबीन, कापसाला चांगला दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सोमठाना गावात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपासून सोयाबीन-कापूस दरवाढ, दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी १० रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्याची लाभ मिळावा, आदी मागण्यासाठी एल्गार मोर्चा काढला. या मोर्चाच्या सांगता सभेत त्यांनी आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा दिला.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तुपकरांना ताब्यात घेतले होते. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ तुपकर यांनी दोन दिवसांपूर्वी सोमठाणा, ता. चिखली येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.