Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water : अतिखोल भूजलस्रोतांचे पुनर्भरण आवश्यक

Team Agrowon

Pune News : ‘‘कमी प्यमानामुळे सध्या भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होऊ लागली आहे. ती वाढविण्यासाठी जमिनीतील अतिखोल भूजलस्रोतांचे पुनर्भरण होणे आवश्यक आहे,’’ असे मत भूजल सर्वेक्षण विभागाचे संतोष गावडे यांनी व्यक्त केले.

‘जल जीवन मिशन’अंतर्गत भूजल स्रोत बळकटीकरण संदर्भात भूजल सर्वेक्षण विभागाचे संतोष गावडे व संजय बनकर यांनी वाल्हे परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी केली.

या प्रसंगी सरपंच अमोल गायकवाड, दादासाहेब मदने, हरीश दुबळे, सचिन भोसले, सोमनाथ गायकवाड, भाऊसो भुजबळ, प्रीतम भोसले आदी उपस्थित होते.

‘‘कमी पर्जन्यमानामुळे परिसरातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. पाण्याचा उपसा वाढल्याने भूजल पातळी खोलवर गेली आहे.

ती वाढविण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत दोन दिवसांत परिसरातील कोरड्या पडलेल्या जलाशयांमध्ये मशिनच्या साह्याने छिद्रे घेऊन खालावलेली भूजल पातळी पूर्ववत करण्याची कामे हाती घेण्यात येतील,’’ असे बनकर यांनी सांगितले. सरपंच अतुल गायकवाड यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT