Raju shetti  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींची सरकारवर टिका

Raju Shetti: महायुतीच्या नेत्यांनी हमीभावावर २० टक्के अनुदान देऊ सांगितलं होतं. मात्र तेही आश्वासन पूर्ण केलं नाही. सोयाबीन कापूस, हरभरा, उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळं जवळपास १५ हजार कोटींचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, असंही शेट्टी म्हणाले.

Dhananjay Sanap

Farmer Loan : शेतकरी कर्जमाफीवरुन महायुती सरकारवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता.१३) घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. पण आता ते पाळायला तयार नाहीत. शेत मजुरांपेक्षा शेतकऱ्यांची बिकट अवस्था असल्याचं केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे, असं म्हणत शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला.

शेट्टी पुढे म्हणाले, "महायुतीच्या नेत्यांनी हमीभावावर २० टक्के अनुदान देऊ सांगितलं होतं. मात्र तेही आश्वासन पूर्ण केलं नाही. सोयाबीन, कापूस, हरभरा, उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळं जवळपास १५ हजार कोटींचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे," असंही शेट्टी म्हणाले.

महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच सोयाबीन ६ हजार रुपये दर देण्याची ग्वाही दिली होती. परंतु निवडणुकीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. यावरूनच आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर सातबारा कोरा करण्याचं आश्वासन का दिलं, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात मागील दोन आठवड्यापासून विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना पंचनामे करून तातडीने मदतीची अपेक्षा आहे. यावरूनही राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच ठिबक सिंचनाचे अनुदान रखडले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनीच संघर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचं शेट्टी म्हणाले.

शक्तिपीठ महामार्गावरून शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शक्तिपीठला विरोध कायम आहे, या महामार्गाची गरज नाही. आधीच रत्नागिरी-नांदेड महामार्ग असताना समांतर रस्ता बनवल्यास आमचा त्याला विरोध आहे. मंत्री नेते फिरतील तेव्हा आम्ही त्यांना जाब विचारू असंही शेट्टी म्हणाले. तसेच शक्तिपीठ महामार्गात ५० हजार कोटींचा घोटाळा होणार असल्याचा आरोपही केला. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधीचे हात ओले होणार आहेत, असंही शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?

Cotton Crop Damage: प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका! कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले

Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’

Goat Health Care: शेळ्यांमधील फुप्फुसदाहाची लक्षणे अन् उपाययोजना

Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी

SCROLL FOR NEXT