Talathi Bharti Exam agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Bharti Exam : २०० पैकी २१४ मार्क मिळवणारा, शेतकऱ्यांचा सातबारा सरळ लिहेल का? राजू शेट्टींची टीका

Talathi Bharati : २०० मार्काचा पेपर सोडवून जर तलाठी भरतीत मुलांना २१४ मार्क मिळवित असतील तर ज्याने २१४ मार्क पाडले आहेत.

sandeep Shirguppe

Talathi Bharti Exam २०२३-२४ : तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. एका विद्यार्थ्याला २०० पैकी २१४ गुण मिळाले आहेत. यामुळे सरळसेवा भरती परिक्षेत सावळा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान यावर आता राज्यभरातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून टिकेची झोड उठवली जात आहे.

राज्यात खरचं सरळसेवा परीक्षांमध्ये घोटाळा होत आहे का? असा सवाल आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारला आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत सखोल चौकशी करण्याच आदेश दिले आहेत.

राज्य सरकारकडून सरळसेवा पध्दतीने तलाठी भरती प्रक्रियेच्या परिक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे. परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २०० मार्काच्या पेपरला २१४ मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परिक्षा कशा पारदर्शक पध्दतीने झाल्या असतील का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्याव्या अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली.

गेल्या अनेक वर्षापासून सरळसेवा भरती प्रक्रिया परिक्षा ज्या कंपन्यामार्फत घेतल्या जातात त्या कंपन्या घोटाळा करतातच हे बऱ्याचवेळेस सिध्द झाले आहे. यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येवून शासनास परिक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आतासुध्दा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणने असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परिक्षा घेऊन पात्रता सिध्द करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल.

महाराष्ट्र विकू नका...

राज्यकर्त्यांनो महाराष्ट्र विकू नका गोरगरीब पोरांच्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवा. २०० मार्काचा पेपर सोडवून जर तलाठी भरतीत मुलांना २१४ मार्क मिळवित असतील तर ज्याने २१४ मार्क पाडले आहेत तो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोणाचे नाव व कोणाचे क्षेत्र दाखवेल याचा अंदाजच न काढलेला बरा.

मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय सरळसेवा भरतीत घोटाळे होत आहेत. MPSC मार्फतच सर्व भरती प्रक्रिया झाल्या पाहिजेत असे शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT