Cloudy Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : खानदेशात ढगाळ वातावरण कायम

Rainy Weather Update : खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी (ता.३१) काही भागात पाऊसही झाला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी (ता.३१) काही भागात पाऊसही झाला. मंगळवारीदेखील (ता.१) ढगाळ व पावसाळी वातावरण होते. यातच केळी, कलिंगड व इतर फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती असून, निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

खानदेशात यंदा थंडी कमी होती. उष्णता आता वाढली आहे. डिसेंबरमध्ये गारपीट झाली. आता उन्हाळ्यातही विषम, खराब वातावरण आहे. मध्यंतरी किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत आले. त्यात आता घसरण व मध्येच वाढ होत आहे. कमाल तापमानातही घट आहे. यातच दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण सतत तयार झाले आहे.

फेब्रुवारीतही काही दिवस सतत ढगाळ व पावसाळी वातावरण होते. रब्बी हंगामात गहू, हरभरा, दादर ज्वारी व इतर पिकांसाठी थंडी आवश्यक होती. पण वातावरण खराब होते. हिवाळ्यात हवी तशी थंडी नव्हती व उन्हाळ्यातही पावसाळी स्थिती आहे.

प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी भाजीपाला, फळ पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्यात केळी, पपईची काढणी सुरू आहे. अनेकांची केळी निसवणीवर असून, काही भागात केळी पीक चार ते दोन महिन्याचे आहे.

अनेकांची केळी काढणीवर आहे. कलिंगड, कारली, गिलके, खरबूज आदी वेलवर्गीय पिकांची लागवडदेखील झाली आहे. यंदा कलिंगडाची लागवडदेखील अनेक भागांत वाढली आहे. शेतकऱ्यांनी हिमतीने लागवड करून पीक वाढविले आहे. अशातच सतत पावसाचे अंदाज, ढगाळ वातावरण, असे चित्र तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.

खानदेशात सध्या सकाळपासून ढगाळ वातावरण असते. दुपारी सुसाट वारा सुटतो. पहाटेदेखील वारा असतो. यामुळे शेतकरी निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. निरभ्र वातावरणात कापणी, मळणीची कामे गती घेतील. खानदेशात कुठेही जोरदार, अतिपाऊस मागील दोन-तीन दिवसांत झालेला नाही. परंतु पावसाळी, ढगाळ वातावरण कायम असल्याने अडचण आहे.

गिरणा, ‘हतनूर’मधून आवर्तन सोडले

भुसावळ शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली असून, हतनूर धरणातून मागील महिन्यात आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळनजीक बंधाऱ्यात हे आवर्तन सोडण्यात आले आहे. बंधाऱ्यात हे आवर्तन आल्याने जलसंचय झाला असून, त्यामुळे शहरवासीयांना टंचाईच्या झळा आता जाणवणार नाहीत.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीपात्रातील बंधाऱ्याची जलपातळी घसरल्यानंतर हतनूर धरणातून आवर्तन सोडले जाते. तसेच गिरणा धऱणातूनही मागील महिन्यात नदीत पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी आठ दिवसांनंतर अखेरच्या भागातील कानळदा (ता.जळगाव) या गावापर्यंत पोचले. यानंतर आवर्तन बंद करण्यात आले. नदीकाठची टंचाई दूर करण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT