Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी ‘भारत जोडो’त साधणार शेतकऱ्यांशी संवाद

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात नाशिक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने या दौऱ्यात गांधी कांदा उत्पादकांशी संवाद साधतील.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सरसावले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात नाशिक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने या दौऱ्यात गांधी कांदा उत्पादकांशी संवाद साधतील. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कांदा प्रश्न ज्वलंत असलेल्या चांदवड तालुक्याची निवड अंतिम मानली जात आहे.

गांधी यांच्या उपस्थितीत रॅली व भव्य शेतकरी मेळावा घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेचे समन्वयक आशिष दुआ व सुशांत मिश्रा यांनी चांदवड तालुक्यात मंगळवारी (ता.२७) येऊन स्थळांची पाहणी केली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्याबरोबर बैठक घेत चर्चा केली.

महाराष्ट्रात न्याय यात्रा दाखल झाल्यावर ती नाशिक जिल्ह्यातून जाईल. या वेळी गांधी यांची मालेगावमध्ये जाहीर सभा होईल. त्यानंतर चांदवड येथे शेतकरी मेळावा होण्याची शक्यता आहे.

शेतीमालाला भाव मिळत नाही. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. बळीराजाला आधार देण्यासाठी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चांदवड येथे शेतकरी मेळावा, रॅली आयोजनाबाबत चर्चा झाली. यात्रेदरम्यान गांधी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतील.
शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार, काँग्रेस.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT