Food Global Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Food Global Conference : श्री अन्न ग्लोबल परिषदेच्या निमित्ताने खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रम

भरड धान्ये ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पौष्टिक तृणधान्ये म्हणून संबोधले जाते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे.

Team Agrowon

Jalna News : दिल्ली येथे श्री अन्न ग्लोबल परिषदेच्या निमित्ताने खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी उपस्थित सरपंचांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

भरड धान्ये ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पौष्टिक तृणधान्ये म्हणून संबोधले जाते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे.

२०२३ हे वर्ष आंतराष्टीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्त दिल्ली येथे १८ व १९ मार्च रोजी या दोन दिवसीय श्री अन्न ग्लोबल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकऱ्यांना खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात ऑनलाइन दाखविण्यात आले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र येथे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, श्री. भेले, श्री. गुंजकर, गृह विज्ञान तज्ञ संगीता कराळे, मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी व शशिकांत पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती या विषयावर मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन करताना देशी गाईंचा वापर करून शेणाचा उपयोग नैसर्गिक शेती करता वापर करणे शक्य आहे. तसेच माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT