Pune News : आषाढी वारीसाठी यंदा महाराष्ट्रासह परराज्यातून सुमारे १५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागास खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे १५ जुलै ८ जुलै २०२४ या कालावधीत पंढरपुरात बासुंदी उत्पादनासह विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी घातली आहे.
पंढरपूर येथे आषाढी वारीचा सोहळा सुरू असून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या कालावधीत खाद्य पदार्थातून विष बाधा होऊ नये याची काळजी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेतली जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे येथील सर्व दूध व दुधजन्य पदार्थ उत्पादक, विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आषाढी वारी कालावधीत बासुंदी उत्पादन करू नये, बासुंदीची विक्री आणि साठा करू नये, अशा सूचना देखील दुकानदार आणि हॉटेल मालकांना देण्यात आल्या आहेत.
तसेच वारीत पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांना तयार भगर पीठ खरेदी करू नये. कोणी भगर पीठ खरेदी केलेच तर ते योग्यरीत्या शिजवूनच खावे असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
आषाढी वारीचा मुख्य सोहळा बुधवारी होणार असून पंढरपुरात १५ लाखांपेक्षा अधिक वारकरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे तब्बल ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली चार अप्पर पोलिस अधीक्षक, २५ उपअधीक्षक आणि ३१७ अधिकारी पंढरीची सुरक्षेसाठी दाखल झाले आहेत. तर वारीत १५४ सीसीटीव्हींची नजर असणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.