Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Maharashtra Assembly: तांदुळवाडी (जि.धाराशिव) मध्ये पवनचक्की प्रकल्पाचा मुद्दा विधानसभेत आज (ता.४) चर्चेचा ठरला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला.
Farmer Exploitation
Farmer ExploitationAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: तांदुळवाडी (जि.धाराशिव) मध्ये पवनचक्की प्रकल्पाचा मुद्दा विधानसभेत आज (ता.४) चर्चेचा ठरला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. कॉंग्रेस नेते अमित देशमुख आणि नाना पाटोले यांनी  या चर्चेत सहभाग घेतला. 

शेतकऱ्यांना कमी मोबदला देऊन आणि धमकावून जमिनी हिसकावल्या जात असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला.आमदार कैलास पाटील यांनी गणेश शेरकर नावाच्या शेतकऱ्याचा दाखला दिला. या शेतकऱ्याने दोन वेगवेगळ्या कंपन्यांना पवनचक्की प्रकल्पासाठी आपली जमीन दिली होती. एका कंपनीने त्यांना ३५ लाख रुपये दिले, तर दुसऱ्या कंपनीने केवळ ४ लाख रुपये दिले.

Farmer Exploitation
Farmer Exploitation : खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट

जेव्हा शेतकऱ्याने दुसऱ्या कंपनीकडे योग्य मोबदला मागितला, तेव्हा पोलिसांनी त्याच्याच शेतात त्याला उसाने मारहाण केली आणि त्याला डांबून ठेवलं. पाटील यांनी संताप व्यक्त करत म्हटलं, “स्वतःच्या शेतात शेतकरी चोर ठरतो, याला काय म्हणायचं?” त्यांनी या प्रकरणात सामील असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली.

Farmer Exploitation
Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

याच मुद्द्याला पुढे नेत, बाबाजी काळे यांनी त्यांच्या मतदारसंघात पवनचक्की प्रकल्प आणि उत्खननासंदर्भात होणाऱ्या बेकायदा कामांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांना फसवलं जात आहे आणि उन्मत्त झालेल्या कंपन्यांना आवर घालण्यासाठी सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली.

कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनीही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यांनी शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आणि संबंधित कंपनीचं नाव सभागृहात जाहीर करण्याची मागणी केली. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनीही याला पाठिंबा देत सरकारला ही नावं जाहीर करण्यास सांगितलं.शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी विधानसभेत जोरदारपणे झाली.

या सर्व प्रश्नांना उत्तर देताना, राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं की, राज्यात एकूण २२ पवनऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत, ज्यामध्ये ८४३ पवनचक्क्या (पवन स्तंभ) सुरू आहेत. या सर्व कंपन्यांची नावं विधानसभेच्या पटलावर सादर केली जातील, असं त्यांनी आश्वासन दिलं.

तसेच, शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी पोलीस महासंचालकांमार्फत केली जाईल आणि त्याच्याकडून हे प्रकरण काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवलं जाईल, असंही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com