Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : उसाला ५ हजारांचा दर मिळावा ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Team Agrowon

Pune News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर (एफआरपी) मिळावा, यासाठी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. उसाचा मूळ रिकव्हरी बेस १०.२५ ऐवजी ८.५ टक्के करून एफआरपी ठरवावी आणि साखरेचे दर द्विस्तरीय करावेत. त्यामुळे उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर मिळू शकतो, असे माने यांनी म्हटले आहे.

वाढीव उत्पादन खर्चाचा समावेश करून तसेच बाजारातील महागाई निर्देशांक विचारात घेवून शेतमालाचे दर ठरवाविण्याची मागणीही माने यांनी केली आहे. माने म्हणाले की, सीएसीपीच्या शिफारशींमुळे उसाचा दर (एफआरपी) ठरवताना मूळ रिकव्हरी बेस ८.५ टक्के होता तो वाढवून १०.२५ टक्के केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रती टन दीड हजार रुपये नुकसान झाले आहे. एफआरपी वाढल्यानंतरही तोडणी वाहतूक वजा करूनच शेतकऱ्यांना बिले दिली जातात.

घरगुती वापरासाठी लागणारी साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये धरली पाहिजे. केवळ २० टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते. उर्वरित ८० टक्के साखर औद्योगिक कारणांसाठी वापरली जाते. यातून कारखाने मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. यासाठी साखेरेचे दर द्विस्तरीय करण्याची मागणी केली जात आहे, असे माने म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांना करमुक्त ठेवावे. सरकारच शेतमालाचे दर ठरवत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाची जबाबदारी सरकारने घ्यावी. सर्व कर कमी करून सरकारने उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर दिला पाहिजे, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT