Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पालखेडचे पाणी येवल्याच्या तलावात

Water Management : पालखेड डाव्या कालव्यातून सुटलेले आवर्तनाचे पाणी शुक्रवारी (ता. २९) सकाळी टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पोहोचले.

Team Agrowon

Nashik News : पालखेड डाव्या कालव्यातून सुटलेले आवर्तनाचे पाणी शुक्रवारी (ता. २९) सकाळी टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पोहोचले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी तलावाची पाण्याची पातळी व जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होऊन शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

पाणीयोजनेचा साठवण तलाव कोरडा पडल्याने सोमवार (ता. २५)पासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. विविध भागांत १५ दिवसांपासून पाणी आलेले नाही. मनमाड, येवल्यासह ५३ गावांना पिण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन सोमवारी सोडले. शुक्रवारी सकाळी येथे पाणी पोचले. एकावेळी येवला, मनमाड रेल्वे व बोकटे येथील तलाव भरण्यासाठी पाणी दिले जात असल्याने कमी क्षमतेने तलावात पाणी येत आहे.

साठवण तलाव कोरडा असल्याने पाटबंधारे विभागाने ५०० क्यूसेसने पाणीपुरवठा सुरू केला आहे. शनिवार (ता. ३०)पासून ७०० क्यूसेसने पाणीपुरवठा तलावात होणार आहे. तलावात कालव्याचे एकच गेट उघडून पाणी दिले. उर्वरित पाणी बोकटे येथील यात्रेसाठी बंधाऱ्याकडे सोडले आहे. अंदरसूल परिसरातील आरक्षित बंधारे भरून देण्यात येणार आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोनच्या तलावाची साठवण क्षमता ५० दशलक्ष घनफूट असून, तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिला जाईल, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा केल्यास तलाव भरण्यासाठी पाच दिवस लागतात.

बोकटे, अंदरसूल येथील बंधारे व येथील साठवण तलाव भरल्यानंतर ३८ गावे पाणीयोजनेचा बाभूळगाव येथील साठवण तलाव भरून दिला जाईल. नंतर मनमाड रेल्वे व मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे पाटोदा येथील साठवण तलावात पाणी सोडले जाईल.

बेसुमार उपसा थांबवा

साठवण तलावाच्या परिसरात खासगी १५० ते २०० विहिरी असून, तलावातील पाणी झिरपून विहिरींमध्ये जाते. विहिरींचा होणारा उपसाही तलाव लवकर आटण्यास कारणीभूत ठरतो. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकरही भरविले जातात.

सध्या सात विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असून, रोजच्या लाखो लिटरच्या पाणी उपशामुळे आणि उन्हाच्या बाष्पीभवनामुळे तलावातील पाण्याची पातळी लवकर खाली जाते. त्यामुळे शहराला तलावातील पाणी पुरविणे आगामी काळात पालिकेपुढे मोठे संकट असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

SCROLL FOR NEXT