Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

Team Agrowon

Mumbai News : ‘‘पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसानकारक ठरले आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजप सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजी करत आहे.

बुधवारी (ता. २९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘‘सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील उभी पिके, द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबीन, तूर, धान, कापूस सर्व पिके वाया गेली आहेत.

शेतकरी संकटात असताना सरकारने तत्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहिजे. या आधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे.

सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.’’

‘मराठा-ओबीसी वाद सरकारचा कार्यक्रम’

‘‘राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपनेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते, पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करीत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम भाजप करत आहे. आरक्षण प्रश्नावरून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सुद्धा सरकारचा ठरवून सुरू असलेला कार्यक्रम आहे,’’ असेही पटोले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT