Jaljeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Mission : ‘जलजीवन’चे १८९ गावांत कामातील अडथळे दूर

Team Agrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या पहिल्या टप्प्यात ८५५ गावांमध्ये कामांना सुरुवात झाली आहे. पण त्यापैकी १८९ गावांत गेल्या काही महिन्यांपासून निविदेच्या तक्रारीमुळे कामे प्रलंबित राहिली होती. पण या गावांचा प्रश्‍नही आता जवळपास निकाली निघाला आहे. त्यामुळे लवकरच या गावांतील कामेही सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशनमधून काम केले जाते. त्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास ८५५ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेवर ८३३.५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या ८५५ गावांपैकी २०० हून अधिक गावांतील पाणी योजनांची कामेही पूर्ण झाली आहेत.

पण अद्याप १८९ गावांच्या निविदेसह अन्य अडचणींमुळे ही कामे प्रलंबित राहिली होती. पण मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यात विशेष लक्ष घातल्याने आणि बऱ्याच तक्रारींचा निपटारा केल्याने या गावांच्या योजनांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जलजीवन’मधील कामे दर्जेदरा करा, पारदर्शकता ठेवा, असा इशारा आव्हाळे यांनी संबंधित ठेकेदारांना दिला. त्यामुळे या कामांच्या पारदर्शकतेबरोबर त्यात गतीही आली आहे. दरम्यान, प्रलंबित असलेल्या १८९ गावांचे जिल्हास्तरावरील अडथळे आता दूर झाले आहेत. मंत्रालयीन स्तरावर या गावांच्या कामांना मान्यता मिळावी, असे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. तेही आठवडाभरात सुटून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

प्रतिकुटुंब पाणीपट्टी होणार निश्‍चित

प्रत्येक गावातील योजना कार्यान्वित करताना त्या योजनेच्या येणाऱ्या खर्चावर त्या गावातील प्रतिकुटुंब पाणीपट्टी निश्‍चित होणार आहे. साधारणतः प्रत्येक कुटुंबासाठी १२०० ते १५०० रुपयांची वार्षिक पाणीपट्टी असू शकते, पाणीपट्टीतून जमा होणाऱ्या रकमेतून या योजनेची भविष्यातील देखभाल दुरुस्ती अपेक्षित आहे, असे नियोजन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT