Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांबाबत तक्रारी आहेत. मात्र असे असताना २०४ योजना पूर्ण झाल्या आहेत तर, २२० योजनांची कामे ९० टक्के व ४८ योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन ही योजना सुरू आहे.
जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन यंत्रणांच्या माध्यमातून योजना राबवली जात आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १२२२ योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यातील काही योजनांच्या फेरअंदाजपत्रक तयार करण्याच्या निर्णयामुळे ३४ योजना सध्या बंद असल्या तरी उर्वरित योजना सुरू आहेत.
यातील २०४ योजनांची कामे पूर्ण झाली असून, १८३ योजनांची कामे अद्याप २५ टक्क्यांच्या आतच आहेत. तसेच २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान काम झालेल्या योजनांची संख्या २३३ आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक व ७५ टक्क्यांच्या आत काम झालेल्या योजनांची संख्या ३३४ आहे.
जलजीवनच्या ३२ योजनांची कामे कागदावरच त्यापुढे २२० योजनांची कामे ९० टक्क्यांपर्यंत झाली असून, ४८ योजनांची कामे ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने मार्च २०२४ पर्यंत १००० योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक गावांमधील योजना पूर्ण झालेल्या आहेत.
निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील ३.७३ कोटींची योजना पूर्ण झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना आता घरापर्यंत शुद्ध पाणी मिळत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे. या वेळी सरपंच दीपक इकडे, शरद शिंदे, भाऊसाहेब डांगळे, अजित सकाळे आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.