Jaggery Production Agrowon
ॲग्रो विशेष

Adulteration Free Jaggery : दर्जा टिकवण्यासाठी भेसळमुक्त गूळ निर्मिती गरजेची

Jaggery Production : दर्जेदार कोल्हापुरी गूळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गूळ तयार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय कृषी संशोधन कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक कुमार पिसाळ यांनी केले.

Team Agrowon

Kolhapur News : दर्जेदार कोल्हापुरी गूळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गूळ तयार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय कृषी संशोधन कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक कुमार पिसाळ यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे कार्यान्वित असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत काढणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रकल्प यांच्या वतीने सुधारित ऊस लागवड आणि गूळ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर कोलोली (ता. पन्हाळा) येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय ऊस पीक कार्यशाळेत डॉ. पिसाळ बोलत होते. सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उसाच्या लागवडीसाठी तसेच गूळ निर्मितीसाठी, संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषीविद्यावेत्ता डॉ. विद्यासागर गेडाम यांनी केले.

डॉ. गोविंद येनगे, डॉ. योगेश बन, डॉ. अभयकुमार बागडे यांनी मार्गदर्शन केले. आभार वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. बापूराव गायकवाड यांनी मानले. कृष्णात गुरव, दीपक पाटील, कौस्तुभ नकाते, सौरभ देशमुख आणि नितीन जाधव यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Forecast Maharashtra : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

SCROLL FOR NEXT