Research on Climate Agrowon
ॲग्रो विशेष

Research on Climate : हवामानावर नवे संशोधन गरजेचे

India Meteorological Department : शेतकऱ्यांसाठी बनवलेली गेलेली विविध मोबाइल ॲपमुळे लोकांना तत्काळ माहिती उपलब्ध होत असून त्याचा फायदा अनेक शेतकरी, नागरिक घेत आहे.

Team Agrowon


Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमान वाढत आहे. त्याचे परिणाम आता दिसून येत आहे. सध्या हवामान विभागाकडे मोठ्या प्रमाणामध्ये डाटा उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर आणि त्यामधून उपयुक्त माहिती आणि नवीन संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी व्यक्त केले.  
भारतीय हवामानशास्त्र सोसायटी, हवामान विभाग, भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या वतीने शनिवारी (ता. २१) ‘हवामान शास्त्रातील नवी माहिती आणि त्याचे शेती व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा कृषी महाविद्यालयातील शिरनामे सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी श्री कृष्णन बोलत होते.

या वेळी हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, भारतीय रिमोट सेन्सिंग संस्थेचे अध्यक्ष संजीवन जी., भारतीय हवामानशास्त्र सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मुजूमदार आदी उपस्थित होते.  

भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, हवामान विभागाकडे गेले १५० वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे. ही माहिती लोकांपर्यंत ईमेल, वृत्तपत्रे, वेबसाइट, न्यूज चॅनेल, अॅप अशा विविध विभागांच्या माध्यमातून पोहोचवण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी बनवलेली गेलेली विविध मोबाइल ॲपमुळे लोकांना तत्काळ माहिती उपलब्ध होत असून त्याचा फायदा अनेक शेतकरी, नागरिक घेत आहे. येत्या काळात सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे.

हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ. आरती बंडगर म्हणाल्या की, हवामान विभागाकडून विविध कालावधीचे हवामान अंदाज दिले जातात. त्यासाठी हवामान विभागाकडील सांख्यिकीचा वापर केला जातो. त्याचा डेटा हवामान विभागाकडे आहे. जे काही अंदाज दिले जातात, त्याची सर्वस्वी जबाबदारी हवामान विभाग घेते. काही वेळा अंदाज चुकले तर पुढील वेळेस त्यात सुधारणा केल्या जातात. त्यानंतर हवामान अंदाज दिले जातात. त्यामुळे नागरिकांना अचूक हवामान अंदाज मिळण्यास मदत होते.

अंदाज देताना दोन अंदाजातील फरक समजून घ्यावा लागतो. मॉन्सूनचे आगमन हे केरळकडून होते. त्याचाही अंदाज दिला जातो. २०२१ नंतर देशातील हवामान अंदाजामध्ये वेगाने अनेक बदल केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये हवामान अंदाजाविषयी महत्त्व वाढले आहे. पावसाचा अंदाज देताना मोठी आव्हाने असतात. परंतु सर्व बाबी तपासूनच ते अंदाज दिले जातात. २०२० पूर्वी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर पावसाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

आयआयटीएमच्या शास्त्रज्ञ डॉ. मेधा देशपांडे म्हणाल्या की, हवामान अंदाज हे त्या भागातील परिस्थितीनुसार अवलंबून असते. त्यासाठी विविध उपकरणे वापरले जातात. त्यानुसार हवामान अंदाज दिले जातात. हवामानाचा परिणाम कोणत्या क्षेत्रावर होत नाही, असे एकही क्षेत्र नाही. हवामान अंदाजाची मागणी विविध विभागाकडून वाढत आहे.

भारतात आयआयटीएम ही प्रमुख संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेत मागील अनेक वर्षांचा डेटा वापरून पुढील पावसाचा व हवामानाचे व परिणामाचे अंदाज दिला जातो. आयआयटीएमच्या मॉडेलमधून पुढील काही वर्षात जगातील तापमान हे वेगवेगळे राहणार असल्याचे चित्र आहे.  भारतीय हवामानशास्त्र सोसायटीचे सचिव डॉ. सबीन टिपे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

सी डॅकमार्फत रिमोट सेंसिंग तंत्रज्ञान आणि त्याचा उपयोग शेतीमध्ये होत आहे. यामध्ये पिकांची वाढ, रोग, लावणी आणि काढणीच्या वेळा यासाठी हे नवीन तंत्रज्ञान उपयोगी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळे नकाशे, माहिती समाज उपयोगासाठी उपलब्ध करून दिली आहे.
- संजीवन जी. अध्यक्ष, भारतीय रिमोट सेन्सिंग संस्था, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

Nisaka Protest: ‘निसाका’ बचावसाठी सर्वपक्षीयांचा एल्गार 

Pulses Sowing: बारामतीत कडधान्य क्षेत्रात यंदा वाढ

Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT