Nashik News : नाशिक : जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी ८ कोटी ८६ लाख रुपयांचा कृती आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मे महिन्यापासून टँकरचा फेरा सुरू होईल, असा अंदाज आहे.
त्यादृष्टिने ग्रामीण भागासाठी १५० टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडून हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी सोमवारी (ता. ३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला.
गेल्यावर्षी पावसाने जिल्ह्यावर कृपादृष्टी केल्याने सद्यःस्थितीत जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव, विहिरींची पाणी साठ्याची स्थिती तुलनेत चांगली आहे. परिणामी तुर्तास जिल्ह्याला पाण्याचे संकट भेडसावत नाही. मात्र, जानेवारी अखेरपासून जिल्ह्यात उन्हाच्या चटका वाढला आहे. पारा थेट ३३ अंशावर जाऊन ठेपला आहे.
त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष टंचाई कृती आराखड्याकडे लागले होते. मात्र, जिल्हा परिषदेकडून कासवगतीने काम सुरू होते. सरतेशेवटी सोमवारी (ता. ३) जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेने सादर केलेल्या आराखड्यात सर्वाधिक खर्च हा टँकरवरच प्रस्तावित करण्यात आला आहे.
२०२३ मध्ये पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पुढील वर्षभर टँकर सुरू होते. मे २०२४ मध्ये सुमारे बाराशेहून अधिक गावांना अंदाजे ४०० टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, त्यानंतर मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. सरासरीपेक्षा अधिक पर्जन्याची नोंद जिल्ह्यात झाली. तरीही यंदा टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने १८.६१ कोटींचा आराखडा तयार केला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून हा आराखडा नाकारण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.