Marathwada Water Crisis : मराठवाड्यात झपाट्याने वाढतेय पाण्याचे संकट

Water Scarcity : यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खरिपाला मोठा फटका बसला. त्यानंतर आता रब्बी पिकांवर संकटाचे ढग अधिक गडद होत आहेत.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात पाणी संकट झपाट्याने वाढते आहे. वेगाने घटत असलेले पाणीसाठे त्याची प्रचिती देत आहेत. एकूण ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ४२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची स्थिती आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खरिपाला मोठा फटका बसला. त्यानंतर आता रब्बी पिकांवर संकटाचे ढग अधिक गडद होत आहेत.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत केवळ ४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत २८ टक्के तर ७४९ लघू प्रकल्पांत केवळ २९ टक्के पाणी शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४१ टक्के तर तेरणा, मांजरा, व रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ५९ टक्केच उपयुक्त पाणी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Water Crisis
Marathwada Water Issue : जायकवाडीत पाणी सोडण्याची प्रतीक्षा कायम

जायकवाडी ४२ टक्क्यांवर

जायकवाडी प्रकल्पात सध्या केवळ ४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. माजलगाव प्रकल्पात सर्वात कमी केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा प्रकल्पात २५, तेरणा १८, तर निम्न दुधना प्रकल्पात २२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. इतर मोठ्या प्रकल्पांपैकी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ८२ टक्के, येलदरीमध्ये ६० टक्के, सिद्धेश्‍वरमध्ये ९४ टक्के, विष्णुपुरी ७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालन्यातील ५७ लघू प्रकल्पांत केवळ ७ टक्के पाणी

जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय धाराशिवमधील २०६ लघू प्रकल्पात १७ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत १३ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २५ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत २७ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पांत ९० टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पांत ७४ टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पांत २६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Crisis
Marathwada Water Issue : मराठवाडा पाणी परिषदेने मागितली ‘एमडब्ल्यूआरआरए’ कडे दाद

मराठवाड्यातील एकूण ७५ माध्यम प्रकल्पांपैकी धाराशिवमधील १७ प्रकल्पांत केवळ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ जालन्यामधील ७ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के, परभणीमधील दोन प्रकल्पांत १९ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत २४ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पांत २५ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ३९ टक्के, तर नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त पाणी आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- मोठ्या प्रकल्पांत ४९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा

- ७४९ लघू प्रकल्पांत केवळ २९ टक्के पाणीसाठा

- ७५ मध्यम प्रकल्पांत २८ टक्के पाणीसाठा

- गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४१ टक्के, तर तेरणा, मांजरा, व रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांत ५९ टक्केच उपयुक्त पाणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com