Solar Pump Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : एकोणीस हजार शेतकऱ्यांचा कृषिपंपांना दिवसा वीज

Solar Krishi Vahini Scheme : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे,

Team Agrowon

Latur News : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे, या योजनेतून लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळांतर्गत पाच महिन्यात ७१ मेगावॉट क्षमतेचे २० सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

यात लातूर जिल्ह्यातील ५० मेगावॉट क्षमतेचे १३ प्रकल्प, बीड जिल्ह्यातील १५ मेगावॉट क्षमतेचे ५ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातील ६ मेगावॉट क्षमतेचे २ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. याप्रकल्पांमुळे लातूर परिमंडळाततील १९ हजार २८ शेतकऱ्यांचे दिवसा सिंचनाचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याव्दारे राज्यात एकूण १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल.

या योजनेत महावितरणच्या वीज उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्याने शासकीय जमिनी घेण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत लातूर परिमंडळात जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. लातूर जिल्ह्यातील ३३/११ केव्ही रेणापूर, ममदापूर, मंगरूळ, तळणी, लामजना, भांतागळी, शिवणखेड, बीटरगाव, कुमठा, झरी, पोमादेवी जवळगा, तपसे चिंचोली व खरोसा उपकेंद्रात एकूण ५० मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील बर्दापूर, खालापुरी, उमापूर, दौडवडगाव व मीरगाव येथे एकूण १५ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातील शहापूर व नारंगवाडी येथे प्रत्येकी ३ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

यामुळे सदरील २० उपकेंद्रातून निघणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांवरील १९ हजार २८ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्यामुळे शाश्‍वत शेती करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे सफल झाल्याची माहिती लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT