
Kolhapur News : शेतकऱ्यांना सौरपंपांची सक्ती न करता ‘महावितरण’कडूनच वीजपुरवठा व्हावा, या मागणीचे निवेदन खासदार धैर्यशील माने यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीद्वारे सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्याकरिता फक्त सौरपंपाची सक्ती केली जात आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. बरेच शेतकरी यांनी स्वतः खर्च करून वीज यंत्रणा उभी केली आहे. तसेच काही ठिकाणी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उभे करून वीज पुरवठ्याची सुविधा झाली आहे.
परंतु या ठिकाणी ही महावितरणद्वारे सौरपंपाची सक्ती केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती नदीकाठावर आहे. त्या ठिकाणी पूर बाधित क्षेत्र असल्यामुळे सौर पॅनेल बसवता येत नाहीत.
डोंगरी तालुक्यामध्ये व वनक्षेत्र जास्त असलेल्या भागांमध्ये सूर्यकिरणांची तीव्रता कमी असल्यामुळे अशा ठिकाणी सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा होऊ शकत नाही. तरी सर्व बाबींचा विचार करता महावितरण कंपनीद्वारे शेतकऱ्यांना ज्यांची मंजुरी जुनी आहे किंवा वीज यंत्रणा उभी करण्यात आली आहे, अशा ठिकाणी तत्काळ वीज जोडणी देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.
तसेच ज्या ठिकाणी सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी महावितरण यंत्रणेद्वारे वीजपुरवठा देण्याबाबत संबंधित महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाला सूचना द्याव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.