Delhi Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Farmers Protest : 'जो पेरू शकतो,... तो'; खासदार कोल्हे यांचा मोदी सरकारला इशारा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभाव कायदा आणि इतर मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर केंद्रातील मोदी सरकारकडून दडपशाही केली जात आहे. त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखले जात आहे. अनेक ठिकाणी बॅरेगेंटींग केली जात आहे. तर शेतकऱ्यांना थोपविण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.

यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना, "जो पेरू शकतो, वाढवू शकतो... तो उपटून फेकूही शकतो" हे सरकारने ध्यानात ठेवावं! असे म्हटले आहे. त्यांनी ही टीका सोशल मिडियावर केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या

हमीभाव कायदा आणि इतर मागण्यांसाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेकडे जात आहे. यामुळे पुन्हा एकदा २०२० प्रमाणे वातावरण तयार झाले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे कूच केली आहे. मात्र याच्या आधी केंद्रातील मोदी सरकार अॅक्शनमोडवर येत हे आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारकडून शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू असून झालेल्या दोन्ही चर्चेतून कोणताही मार्ग निघालेला नाही.

यादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी, "जय जवान, जय किसान" हा आपल्या देशाचा नारा होता. मात्र आज केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आपले जवान व किसान एकमेकांच्या समोर शस्त्र घेऊन उभे आहेत. स्वतःच्या देशातील नागरिकांना एकमेकांच्या विरोधात झुंजवत ठेवणे हेच केंद्र सरकारचे प्राथमिक धोरण दिसते असल्याची टीका त्यांनी केली आहे.

भाजप सरकारचे अवाक्षरही नाही

यावेळी कोल्हे यांनी, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, शेतकऱ्यांना हमीभाव, शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान, शेतकऱ्याचे हिंस्र प्राण्यांपासून रक्षण अशा अनेक मागण्यांवर संसदेत आवाज उठवल्याचे सांगितले आहे. मात्र केंद्रातील भाजप सरकारने यावर अवाक्षरही काढले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

जो पेरू शकतो, तो...

तर साध्या साध्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चालढकल करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मात्र तातडीने सीमेवरील सैन्य हलवून शेतकऱ्यांच्या समोर आणून ठेवले, बळीराजाच्या वाटेत खिळे ठोकले, शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा माराही सुरू केला. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांवर बंदूक रोखण्याचं पाप या सरकारने केलंय याची किंमत सरकारला चुकवावीच लागेल, "जो पेरू शकतो, वाढवू शकतो... तो उपटून फेकूही शकतो" हे सरकारने ध्यानात ठेवावं! असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

शेतकरी दिल्लीच्या दिशेने

हमीभाव कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या शंभू, खनौरी-जिंद आणि डबवाली सीमांजवळ पोहचले आहेत. तर ते दिल्लीत घुसू नयेत म्हणून पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरूवात केली आहे. तसेच दिल्ली आणि परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या नळकांड्या

दरम्यान आंदोलक शेतकरी हा दिल्लीच्या शंभू सीमेवर मोठ्या संख्यने जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहेत. तर अश्रू धुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT