PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Akola : पंदेकृवि, सिंजेंटा फाउंडेशन, सिंजेंटा इंडिया लि. यांच्यात सामंजस्य करार

Syngenta Foundation : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत कृषी तंत्र विद्यालयामधून कृषी पदविका कार्यक्रम राबविला जातो. ग्रामीण भागातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत कृषी तंत्र विद्यालयामधून कृषी पदविका कार्यक्रम राबविला जातो. ग्रामीण भागातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित तांत्रिक प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने सिंजेंटा फाउंडेशन इंडिया आणि सिंजेंटा इंडिया प्रा. लि. (पुणे) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.

या कराराअंतर्गत कृषी पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन आठवड्याचे तांत्रिक प्रशिक्षण आणि दोन महिन्यांचे प्रक्षेत्रावरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यापीठाच्या घटक कृषितंत्र विद्यालयात दरवर्षी आयोजित केले जाईल. खाजगी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याचे अपेक्षित आहे.

सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन सुद्धा देण्याचे प्रकल्पांमध्ये प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या प्रथम भागामध्ये विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विद्यापीठाच्या घटक कृषी तंत्र विद्यालयातील दरवर्षी ४० ते ५० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे पुढील पाच वर्षांत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ सिंजेंट फाउंडेशन इंडिया आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कराराअंतर्गत विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचे अपेक्षित आहे. हा सामंजस्य करार पाच वर्षांसाठी आहे. प्रकल्पाची यशस्वीता लक्षात घेऊन पुढील धोरण ठरविण्यात येईल. सामंजस्य करार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

या सामंजस करारावर विद्यापीठाच्या वतीने कृषी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने तर सिंजेंटा फाउंडेशनतर्फे डॉ. विक्रम बोराडे यांनी स्वाक्षरी केली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये तंत्र शिक्षण रुजविणे गरजेचे आहे ज्यायोगे आदर्श गावाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य होईल तसेच विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी करून त्यांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे सुद्धा साध्य करता येईल, असे मत व्यक्त केले.

सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाच्या निम्न कृषी शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र काटकर यांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला डॉ. काटकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माने यांनी कृषी पदविका तंत्रशिक्षण यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये क्षमतानिर्मिती करण्यासाठी कराराचा अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे, असे सांगितले.

या वेळी कृषी विस्तार विभागाचे विभाग प्रमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, सिंजेंट फाउंडेशन इंडियाचे प्रमुख डॉ. विक्रम बोराडे, पवन देशमुख, श्री. कोरुस्कर, अॅड. वानखडे, निम्न कृषी शिक्षण विभागातील डॉ. विजय पारडे, डॉ. अनिल गोमासे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT