Fruit Drop Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Drop Management : फळगळ टाळण्यासाठी उपाय

Climate Change : बदलत्या वातावरणामुळे फळपिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. मागील ३ वर्षांपासून लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये फळगळतीचे प्रमाण वाढले आहे.

Team Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

डॉ. यू. आर. सांगले

Fruit Farming Management : बदलत्या वातावरणामुळे फळपिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. मागील ३ वर्षांपासून लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये फळगळतीचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. मुखत्वेकरून कोलेट्रोट्रिकम या बुरशीमुळे अनेक भाजीपाला पिके, कडधान्ये, फळपिके तसेच तृणधान्ये यावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे लिंबूवर्गीय फळपिकांमधे कोलेट्रोट्रीकम कॉबिटियेंस आणि कोलेट्रोट्रीकम सियामेन्स या दोन नवीन प्रजातींच्या बुरशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे फळगळीचे प्रमाण अधिक वाढले आहे. प्रादुर्भावामुळे आंबिया बहरातील बागेत फळ धारणेपासून काढणीपर्यंत फळगळीमुळे सुमारे ३० ते ४० टक्के नुकसान होत आहे.

मागील वर्षी या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे काही बागांमध्ये सुमारे ४० ते ५० टक्केपर्यंत फळगळ झाल्याचे दिसून आले. प्रादुर्भावामुळे फळे परिपक्व होण्यापूर्वीच देठापासून पिवळसर झाल्याची दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.

लक्षणे

प्राथमिक प्रादुर्भाव छोट्या फळांच्या देठाभोवती दिसून येतो.

दुय्यम प्रादुर्भाव पानांवर किंवा फळांच्या देठाभोवती बुरशीचे बीजाणू तयार होऊन फळांच्या आतील भागात प्रवेश करतात त्यावेळी दिसतो. त्यामुळे अपरिपक्व फळांची गळ होते.

फळे परिपक्व होण्यापूर्वीच देठापासून पिवळसर झाल्याची दिसून येतात.

कोलेट्रोट्रीकम प्रजातीच्या बुरशीच्या अनेक प्रजातींमुळे रोगाची लक्षणे उद्‍भवतात.

ही बुरशी जमिनीत ४ वर्षांपर्यंत जीवंत राहू शकते.

अनुकूल हवामान घटक

अवकाळी पाऊस, थंड ते उबदार हवामान.

२० ते ३० अंश सेल्सिअस तापमान

जमिनीचा जास्त सामू.

पाऊस, दव, रस शोषक किडींद्वारे रोगाचा प्रसार.

एकात्मिक व्यवस्थापन

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.

रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कमी राखणे शक्य होते.

बागेतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

बागेचे नियमितपणे निरिक्षण करावे.

बांधावरील तण काढून बांध तणमुक्त ठेवावेत.

बागेत स्वच्छता राखावी.

बागेत फवारणीची कामे शक्यतो सकाळी लवकर करावी. दुपारी उष्ण वातावरणात फवारणी करणे टाळावे.

बागेत वापरलेली हत्यारे, अवजारे वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे.

ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब करावा.

फळ तोडणीनंतर त्यांची हवेशीर जागी साठवण करावी. जेणेकरून फळ तोडणीनंतर फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.

रासायनिक नियंत्रण : (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

थायोफेनेट मिथाइल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम अधिक स्टीकर १ मिलि

 पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

डॉ. यू. आर. सांगले, ९५१८९ ९२२१३

(प्रमुख शास्त्रज्ञ, वनस्पती रोगविज्ञान, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था,  नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT