Manoj Jarange-Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange-Patil : मराठ्यांना आरक्षण द्या, नाय तर पुढची जबाबदारी सरकारची... ; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Swapnil Shinde

Jalna News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने दिलेली मुदत आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवली सराटी येथे जाहीर सभा झाली. या सभेला राज्यभरातील लाखो मराठा बांधव एकत्र जमले आहेत. त्यावेळी जरांगे पाटील यांनी सभा घेऊन आरक्षण द्या, नाय तर पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा सज्जड इशारा दिला आहे.

यावेळी जरांगे यांनी भरसभेत सरकारकडे सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी भरसभेत मंत्री छगन भुजबळ आणि वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिले आहेत. दहा दिवसानंतर तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर ४० व्या दिवशी काय करणार हे सांगू, असा सूचक इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT