Mango and Cashew Tree
Mango and Cashew Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू बागांवर संकट

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील मालपे आणि पोंभुर्लेला पावसाने शनिवारी (ता. २०) पहाटे झोडपून काढले. याशिवाय जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह सरी कोसळल्या आहेत. पावसाचे वातावरण कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागांवरील संकट अधिक गडद झाले आहे.

जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचे वातावरण आहे. बुधवारी (ता.१७) रात्री उशिरा जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर शुक्रवारी (ता. १९) दिवसभर पावसाचे वातावरण होते.

दरम्यान, शनिवारी पहाटेपासून जिल्ह्यात विजांचा गडगडाट सुरू झाला. देवगड तालुक्यातील मालपे, पोंभुर्ले या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसाच्या सरीवर सरी या भागात कोसळल्या. वाऱ्याचा वेग देखील वाढला होता.

दरम्यान, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वैभववाडी यासह विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाचे वातावरण कायम आहे.

गेले चार-पाच दिवस असलेले ढगाळ वातावरण, सध्या पडत असलेला पाऊस आणि पुढील दोन, तीन दिवस पावसाची शक्यता, यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आंबा हंगाम सुरू आहे. वातावरणाचा मोठा परिणाम आंबा हंगामावर होणार आहे. दमट वातावरणामुळे फळमाशीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

तीन दिवस पावसाचा अंदाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत विजांच्या लखलखाटांसह पाऊस आणि ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT