Tomato Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Damage : सदोष बियाण्यांमुळे टोमॅटोचे मोठे नुकसान

Tomato Cultivation : टोमॅटो लागवडीनंतर साधारण ७५ दिवसांत पहिला तोडा तोडणीला येतो. यंदा मात्र वीस दिवस आधीच टोमॅटो तोडणीला आले. मात्र आलेली फळे खराब व बाधित असल्याने पीक हाती आले नाही आणि उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Suryakant Netke

Nagar Tomato News : टोमॅटो लागवडीनंतर साधारण ७५ दिवसांत पहिला तोडा तोडणीला येतो. यंदा मात्र वीस दिवस आधीच टोमॅटो तोडणीला आले. मात्र आलेली फळे खराब व बाधित असल्याने पीक हाती आले नाही आणि उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदोष बियाण्यांमुळे नुकसान झाल्याचा आरोप अकोले, संगमनेर तालक्यांतील शेतकऱ्यांनी केला आहे.

उत्पादन खर्चही निघाला नसल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते बैठका घेत आहेत. कृषी विभागाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे विभागाचे म्हणणे आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव व पारनेर तालुक्यांच्या काही भागांत उन्हाळी टोमॅटोचे पीक घेतले जाते. शेजारच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, तसेच नाशिकमधील अनेक भागांत टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते.

साधारण मार्च-एप्रिलमध्ये टोमॅटो तोडणीला सुरुवात होते. या वर्षी उन्हाळ्यात टोमॅटोला दर मिळाला नाही. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा २० दिवस हंगाम आधीच सुरूच झाला. मात्र पहिल्याच तोडीला आलेली फळे खराब आली. टोमॅटोवर यंदाही व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला.

सदोष बियाण्यांमुळे हंगाम दहा दिवस आधीच सुरू झाल्याने नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि मदत मिळावी यासाठी शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक आहेत.

बैठका घेऊनही दखल नाही

अकोले तालुक्यात टोमॅटो उत्पादकांचे झालेले नुकसान हे सदोष बियाण्यांमुळे झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. केवळ सदोष बियाण्यांमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत शेतकरी नेते सुरेश नवले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी विभागासोबत बैठका घेतल्या.

निळवंडे धरणाच्या पाणी चाचणीवेळी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर दोन-तीन वेळा कृषी विभागासोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकाही झाल्या, मात्र कृषी विभागाने सदोष बियाण्यांबाबत काहीही कारवाई केली नाही.

टोमॅटोचे नुकसान झाल्यावर भरपाई देण्याची तरतूद नाही, हा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.

अकोले, संगमनेरसह राज्यातील अनेक भागांत उन्हाळी टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. हे सदोष बियाण्यांमुळे झाले. खराब फळांमुळे बाजारात दर मिळाला नाही. नुकसान झाल्यास नुकसान भरपाई शासन देत असताना टोमॅटो उत्पादकांना मात्र शासन वाऱ्यावर सोडत आहे. टोमॅटो उत्पादकांना मदत द्यावी आणि बियाण्यांबाबत कठोर कारवाई करावी.
सुरेश नवले, शेतकरी नेते, अकोले, जि. नगर
यंदाही टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाया गेले. बाजारात दर मिळाला नाही. त्यात यंदा बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांऐवजी रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांना बियाणे पुरवले. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने रोपवाटिकांकडून रोपे खरेदी करावी लागली. साधारण पंचवीस दिवसांच्या रोपांची लागवड होणे गरजेचे आहे. रोपवाटिकाचालकांना ३५ ते ४० दिवसांची रोपे दिल्याने ७० दिवसांत सुरू होणारा तोडा ५० दिवसांतच सुरू झाला. यामुळे नुकसान झाले. तक्रार केली, मात्र अजून दखल घेतली नाही.
सागर देशमुख, टोमॅटो उत्पादक शेतकरी, उंचखडक, ता. अकोले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT