Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदलाचे संकेत? एमएसआरडीसीने पर्यावरण परवानगीचा प्रस्तावही घेतला मागे

Change in the Shaktipeeth Highway : राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण आता याला विरोध होताना दिसत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण या महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून विरोधाला सामोरे जाव लागत आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी महामार्गाला जोरदार विरोध केल्याने आता राज्य सरकारने महामार्गाच्या संरेखनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दाखल केलेला पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव देखील मागे घेतला आहे. पण सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी विरोध सुरूच ठेवला आहे.

राज्यातील धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली राज्यातील महायुती सरकारने नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मिती घाट घातला होता. पण या महामार्गासाठी कोल्हापूर आणि सांगलीसह १२ जिल्ह्यातून शेत जमिनी घेण्यात येणार आहेत. कोल्हापूरसह सांगलीतील जिरायती आणि बागायती शेत जमिनींना मोठा फटका बसणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी एकवटा आहे. तसेच शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन करून याला विरोध केला जात आहे. या विरोधात सत्ताधारी पक्षासह विरोधी आमदार देखील असल्याने आता सरकारची गोची झाली आहे.

त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे फटका बसू नये यासाठी सरकार काळजी घेतना दिसत आहे. याचपार्श्वभूमिवर एमएसआरडीसीने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा करून महामार्गाचे संरेखन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ८०५ किमीच्या संरेखनात बदल केला जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी पर्यावरणविषयक परवानगीसाठी दाखल केलेला प्रस्ताव देखील मागे घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर महामार्गाच्या संरेखनात बदल करण्याचा निर्णयामुळे पर्यावरणविषयक परवानगीसाठी नवा प्रस्ताव तयार करावा लागणार असल्याचेही एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.

नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार विभागांना जोडणारा असून तो ८०५ किमी लांबीचा आहे. तर या शक्तिपीठ महामार्गात वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांचा समावेश आहे.

याआधीच ८०५ किमी लांबीच्या महामार्गाचे संरेखन अंतिम करण्यात आले असून आराखडाही तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे विविध ठिकाणी भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात केली होती. मात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी, स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांचा या महामार्गास विरोध वाढल्याने सरकारला आपली भूमिका मवाळ करावी लागली आहे. तरीदेखील शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT