Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers protest : बॅरिकेड हटवताच दिल्लीकडे कूच; शंभू सीमेवरील शेतकरी नेत्यांच्या बैठकीत निर्णय

Aslam Abdul Shanedivan

Pune News : शंभू सीमेवर शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर आणि जगजितसिंग डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.१४) बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. तसेच 'दिल्ली चलो' आंदोलनावर मंथन केले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखण्यात येईल, असे ठरवण्यात आले. तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हरियाणा पोलिसांना एक आठवड्यात बॅरिकेडिंग हटवावे लागणार आहे. त्यामुळे बॅरिकेडिंग हटताच दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीतील मोर्चासाठी आणखी एक आठवडा शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

हरियाणाच्या शंभू सीमेवर हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारी पासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वात सुरू आहे. यादरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा पोलिसांना बॅरिकेडिंग हटण्याचे आदेश देताना कान टोचले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील याचप्रकरणी हरियाणा सरकारला खडे बोल सुनावत शेतकरी ही या देशाचे नागरीक आहेत. त्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे म्हटले होते. यानंतर हरियाणा पोलिसांना एका आठवड्यात बॅरिकेडिंग काढून घ्या. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी द्या असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर रविवारी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी बैठक घेऊन दिल्ली चलो आंदोलनावर निर्णय घेतला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली मार्चच्या निर्णयावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र दिल्ली चलो आंदोलनासह इतर बाबींवर १६ जुलै रोजी पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. तर १७ आणि १८ जुलै रोजी अंबाला पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या आंदोलनावर चर्चा झाली करण्यात आली. यावेळी आंदोलक शेतकरी नवदीप सिंग जलबेरा यांच्या सुटकेची देखील मागणी शेतकरी नेत्यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अद्याप हरियाणा सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे या आठवड्यात सरकार कोणती भूमिका घेत यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. मात्र शेतकरी संघटनांचा एका गटाकडून दिल्ली मोर्चा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत हरियाणा सरकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा आदेश मानत नाही. तोपर्यंत दिल्ली मोर्चा आठवडाभर थांबवावा लागेल यावर शेतकरी नेते ठाम आहेत.

विरोधी पक्षनेत्यांची भेट

शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी यावेळी, देशातील विरोध पक्षांच्या खासदारांना पत्र दिल्याचे सांगितले. तर आता २२ जुलै रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या समोर तज्ज्ञ बाजू मांडतील.

तर शेतकरी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन आणि C२ + ५०% नफा सूत्राच्या आधारे सर्व पिकांना हमीभाव मिळावा अशी मागणी करतील. त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खाजगी विधेयक आणण्याची मागणी करतील असे शेतकरी नेते डल्लेवाल यांनी सांगितले. तसेच डल्लेवाल यांनी, या बैठकीला देशभरातील २०० हून अधिक शेतकरी नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीत शेतकरी नेत्यांची भेट घेणार असल्याचेही डल्लेवाल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT