Crop Insurance 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance 2024: ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांना खरीप २०२४ पीक विमा जमा होणार; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची ग्वाही

Kharif 2024 Crop Insurance : खरीप हंगाम २०२४ चा पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत. कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित विमा रक्कमेवरून विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Dhananjay Sanap

Kharif 2024 Pik vima : पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप २०२४ ची नुकसान भरपाई देण्यासाठी २१९७.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीवर आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप ३१ मार्चपूर्वीच करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (ता.१९) विधीमंडळात दिली आहे.

कोकाटे म्हणाले, "३१ मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल. राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल. परंतु ३१ मार्चपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप २०२४ चे विमा भरपाई रक्कम जमा करण्यात येईल." अशी ग्वाही कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली आहे.

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी मात्र राज्य सरकारवर टिका केली. पाटील म्हणाले, "खरीप पीकविमा ऑगस्ट महिन्यात जमा होणं अपेक्षित होतं. पण राज्य सरकारने कंपन्यांना वेळेवर हिस्सा दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमाही वेळेवर मिळाला नाही." असं पाटील म्हणाले.

तसेच पीक विमा कंपन्या मंजूर पीक विमाही शेतकऱ्यांना वाटप करत नाहीत. बँकांकडून त्यावरील व्याज घेतात परंतु शेतकऱ्यांना विमा रक्कम देत नाहीत, याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्ष वेधलं.

खरीप हंगाम २०२४ चा पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित पीक विमा रक्कमेवरून विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला. आमदार राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्यावर उत्तर देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते.

दरम्यान, राज्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्यांना दिल्या. काही भागात पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही खरीप २०२४ चा पीक विमा मिळाला नाही. राज्य सरकार आणि पीक विम्या कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bhavantar : मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भावफरक केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासव गतीने

Farmers Protest: ‘सीनारमास’ विरोधात शेतकरी आक्रमक

Lumpy Skin Disease: लम्पी रोग पुन्हा फोफावला! शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Soybean Procurement: सोयाबीन खरेदी केंद्रांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना

Kolhapur Politics: कागलच्या राजकारणाला कलाटणी, कट्टर विरोधक हसन मुश्रीफ- समरजितसिंह घाटगे एकत्र, युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT