Ahilyanagar News: राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले नाही. पुणतांब्यातून २०१७ मध्ये देशव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आलेली होती.
त्याचा चांगला परिणाम झाला. सरकारला कर्जमाफी करावी लागली. आता पुन्हा शेतकरीप्रश्नी संप करण्याची वेळ आली आहे. कर्जमाफी, शेतीमालाला हमीभावासाठी पुन्हा पुणतांब्यातून शेतकरी लढा उभा करा, मी तुमच्या पाठीशी राहील, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री. कडू यांनी गुरुवारी (ता. २४) सायंकाळी पुणतांबा (ता. राहाता) येथे भेट दिली.
तसेच २०१७ मध्ये शेतकरी संप काळातील प्रमुख डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, धनंजय धोर्डे, बाळासाहेब भोरकडे, अभय चव्हाण, शिवसेना नेते महेश कुलकर्णी, प्रताप वहाडणे, हेमंत कुलकर्णी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा सत्कार करून संवाद साधला.
श्री. कडू म्हणाले, की सध्या जाती-जातीत भांडणे सुरू झालेली आहेत. याकडे दुर्लक्ष करा. शेतकरी जात महत्त्वाची आहे. हे समजून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन मोठ करा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.