
Yavatmal News : राज्यात धार्मिक, जातीय मुद्दे पुढे करून शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना बदल देण्यात येत आहे. राज आणि उद्धव ठाकरे मराठी, हिंदू म्हणून एकत्र येत असतील तर मराठा-ओबीसी म्हणून शेतकरी, शेतमजूर म्हणून देखील एकत्र यायला पाहिजे. अशी भूमिका ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मांडली.
विश्राम भवन येथे रविवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत श्री. कडू बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण अशा १३८ किलोमीटरच्या पदयात्राला सोमवारी (ता. ७) सकाळी १० वाजता पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून यात्रेला सुरुवात होणार आहे.
१४ जुलै राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या साहेबराव करपे यांच्या चिलगव्हाण गावात यात्रेचा समारोप होणार आहे. आठ दिवसांत १३८ किमीची ही पदयात्रा असणार आहे. यात्रेदरम्यान ते गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
भाकड गायींबाबत भाजपचे धोरण काय?
गाय वाचली पाहिजे असे सरकारला वाटते, मग भाकड गाय पोसण्यासाठी सत्तेवर बसलेल्या भाजपने काय धोरण आखले, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला. जगाच्या पाठीवर भाजप एवढा हुशार पक्ष नाही. निवडणूक तोंडावर असताना हिंदी सक्तीचा निर्णय का घेतला हा संशोधनाचा विषय असून यामागे षडयंत्र काय आहे, हे तपासले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.