Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain Update : खानदेशात जोरदार सरींची प्रतीक्षा पूर्वहंगामी पिकाची स्थिती बरी

Jalgaon Rain : खानदेशात जोरदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. ढगाळ वातावरण आहे. आकाशात ढगांची गर्दी होते. मात्र, काही वेळेत पाऊस न पडताच ढगांची गर्दी नाहीशी होते. काही ठिकाणी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. मात्र पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon Rain Update : खानदेशात जोरदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. ढगाळ वातावरण आहे. आकाशात ढगांची गर्दी होते. मात्र, काही वेळेत पाऊस न पडताच ढगांची गर्दी नाहीशी होते. काही ठिकाणी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. मात्र पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही.

खानदेशात गेल्या रविवारपासून ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस होत आहे. सोमवारी (ता.२६) व मंगळवारी (ता.२७) खानदेशात दुपारच्या वेळी मध्यम पाऊस झाला.

तसेच मंगळवारी मध्यरात्रीनंतरही मध्यम पाऊस जळगाव, धरणगाव, चोपडा, भुसावळ, जामनेर आदी भागात झाला. सोमवारी दुपारी आठ ते १० मिनीटे पाऊस झाला. मंगळवारीदेखील १० ते १२ मिनीटे हलका ते मध्यम पाऊस होता. सर्वत्र हा पाऊस झालाच नाही. धुळे, जळगावात कमी पाऊस आहे. नंदुरबारातही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.

शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णतः खोळंबल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाने २५ जूननंतर पाऊस पडेल, हे स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

पाऊस नसल्याने जलस्रोत आटले असून, नदी व नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. असे असले तरी खरिपाच्या पेरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे.

जून महिन्याचे २७ दिवस निघून गेले, तरी दमदार पाऊस पडलेला नाही. उडीद, मुगाचे पीक घेणे आता शक्य नाही. आता दमदार पाऊस झाल्यास कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका आदी पिके घेता येणे शक्य आहे.

सोमवार व मंगळवारी पाऊस झाला. तसेच ढगाळ, थंड वातावरणही आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापूस पिकात आंतरमशागतीला वेग दिला. तसेच सिंचनही बंद केले. कारण काळ्या कसदार जमिनीत सिंचनानंतर पाऊस आल्यास नुकसान होण्याची किंवा पिकात मर रोग येण्याची भिती असते.

अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने खतेही पिकांना दिली आहेत. खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड पूर्ण झाली आहे. ही लागवड यंदा सुमारे सव्वालाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. परंतु कोरडवाहू किंवा हंगामी कापूस लागवड सुरू झालेली नाही.

पाच टक्केच पेरणी..

खानदेशात खरिपात १४ लाख हेक्टवर पेरणी होईल. यातील पाच टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, यावल, चोपडा, अमळनेर, जळगाव भागात काही शेतकऱ्यांनी कापूस, तूर, उडदाची धूळ पेरणी केली आहे. सोयाबीनची धूळपेरणी मात्र शेतकऱ्यांनी टाळली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT