Maharashtra Heat Wave agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट, विद्यार्थ्यांना सुट्टी द्या, शिक्षक परिषदेसह राज ठाकरेंची मागणी

Student in Maharashtra : राज्यात उष्णतेचा पारा ४० अंशावर गेल्याने मुंबईसह राज्यातील केंद्रीय मंडळाच्या तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेचा पारा ४० अंशावर गेल्याने मुंबईसह राज्यातील केंद्रीय मंडळाच्या तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना सुट्टी घोषित करून शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होम घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

याच अनुषंगाने शाळांमध्ये शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था अथवा सवलत देण्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. उष्णतेमुळे मुलाबरोबर शिक्षकसुद्धा तापाच्या साथीने हैराण आहे. त्यामुळे शिक्षकांना ही वर्क फ्रॉम होम देऊन निकालाची सर्व कामे घरूनच ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांसाठी परवापासून सुट्टी घोषित करावी आणि १५ जून रोजी शाळा उघडतील, असेही शासनामार्फत घोषित करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

त्यानुसार राज्यात १८ एप्रिलपर्यंत राज्य शिक्षण मंडळाच्या काही परीक्षा आणि त्यासंदर्भातील कामकाज सुरू असलेल्या कामात बदल करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे.

तसेच सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या शालेय पोषण आहार वाटपात बदल करून कोरडा शिधा विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत पोहोचवता येईल का, याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यावर मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही सरकारला पत्र लिहले आहे. राज ठाकरे यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, 'गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.', असे म्हणत राज ठाकरे यांनी हवामान खात्याने आधीच उष्णतेची लाट येण्याची कल्पना का नाही दिली असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्यातील उष्णतेची लाट लक्षात घेता त्यांनी शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे. त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.'

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue: केळी उत्पादक तोट्यात

Agri Solar Pump: सौर कृषी पंपांसाठी कंपनीकडून निकृष्ट दर्जाचा साहित्य पुरवठा

Fragmentation Act: तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांसाठी शोधमोहीम

Farmer Compensation: भरपाईची ८७ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Shaktipeeth Expressway: ''मोठ्या कंपन्यांना टेंडर देण्यासाठी...'' 'शक्तिपीठ'वरून राजू शेट्टी आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT