Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurances : वाशीमच्या पीकविमा अग्रिमबाबत विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी

Team Agrowon

Washim News : या खरीप हंगामात ऑगस्टमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने मीड सीझन लावून अग्रिम देण्याबाबत विमा कंपनीला जिल्हा प्रशासनाने सूचना केली आहे. मात्र, ही मदत करण्यास कंपनीने आक्षेप घेत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. यावर सोमवारी (ता.९) सुनावणी झाली असून आयुक्तांनी कृषी विभाग व पीकविमा कंपनीची बाजू ऐकून घेतली. त्यांच्या निर्णयाची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.

खरीप हंगामात वाशीम जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाल्याने अग्रिम देण्याबाबत जिल्हा समितीने वीमा कंपनीला निर्देश दिले होते. कंपनीने नियमांवर बोट ठेवत याबाबत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केल्याने त्यावर सोमवारी (ता.९) सुनावणी घेण्यात आली. यावेळी कृषी विभाग व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी अमरावती विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी म्हणजे अवघा ३२ टक्के पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होऊन उत्पादकता कमी येण्याबाबत स्पष्ट केले.

पाऊस कमी झाल्याने मीड सीझन अंतर्गत शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम देण्यास विमा कंपनीने मान्य करावे असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या पथकांनी सर्वेक्षण करून पीक नुकसानीचा अहवाल तयार केलेला आहे. या सर्वेक्षणावेळी विमा कंपनीने त्यांचे प्रतिनिधी पथकात सहभागी केलेले नव्हते. आता कंपनी हा अहवालही मान्य न करता नियमांवर बोट ठेवत आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर कंपनीची बाजू मांडताना सलग पावसात खंड नसल्याचे म्हटले. कृषी खात्याने मात्र सक्षमपणे बाजू लावून धरत शेतकऱ्यांना अग्रिम दिला पाहिजे, असे स्पष्ट केले.

आयुक्तांच्या निकालाची प्रतीक्षा

वाशीम जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ९९ हजार ८७७ शेतकरी योजनेत सहभागी झालेले आहेत. तीन लाख ४७ हजार ९२५ हेक्टरचा पीकविमा उतरविला होता. वाशीम तालुक्यात ६७५१५ हेक्टर, रिसोड ६२९४९, मालेगाव ५८४५३, मंगरूळपीर ५३०६३, मानोरा ४५१०५ आणि कारंजा तालुक्यातील ६० हजार ८४० हेक्टरचा समावेश आहे. खरिपात पीक नुकसानीबाबत ७१ हजार ५३४ सूचना शेतकऱ्यांकडून आलेल्या आहेत.

पीकविमा योजनेच्या शासन निर्णयानुसार पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बाबीअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. विशेषतः वाशीम जिल्ह्यातील सर्व ४६ महसूल मंडलांमध्ये पीक नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा समितीने वीमा कंपनीला आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याची अधिसूचना काढलेली होती. कंपनीला हे मान्य नसल्याने आक्षेप घेत अपील दाखल केले. या प्रकरणाची सोमवारी सुनावणी घेण्यात आलेली असून विभागीय आयुक्तांच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT