Crop insurance : पीकविमा कंपनीने अग्रिम आदेशाविरुद्ध दाखल केले अपिल

PMFBY Crop insurance : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यात पावसाचा सलग खंड पडल्याने पीक उत्पादनाला फटका बसला. झालेल्या नुकसान पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत गेल्या काळात अधिसूचना काढलेली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Washim News : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यात पावसाचा सलग खंड पडल्याने पीक उत्पादनाला फटका बसला. झालेल्या नुकसान पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत गेल्या काळात अधिसूचना काढलेली आहे. मात्र विमा कंपनीने याविरुद्ध अपिल दाखल केल्याची माहिती समोर आली असून, नुकसान भरपाईचा विषय लटकण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Crop Insurance
Soybean Rate : सोयाबीन उत्पादनाबरोबर दरही घटला, सांगा शेतकऱ्यांनी करायचं काय?

कमी पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेले आहे. ऐन गरजेच्या काळात सलग पाऊस खंड पडल्याने पीक उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४६ महसूल मंडलांमध्ये पिकांचे यामुळे नुकसान झालेले आहे. सलग तीन ते चार आठवडे ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला तर पीकविमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के अग्रिम मदत देण्याची तरतूद आहे. मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणात नुकसानीची बाब समोर आली होती. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीने २५ टक्के अग्रीम देण्याबाबत अधिसूचना जारी केली. मात्र विमा कंपनीने याविरुद्ध विभागस्तरावर अपिल दाखल केले. जिल्हा समितीने काढलेल्या अधिसूचनेला कंपनीने आक्षेप नोंदवला आहे. आता विभागीय पातळीवर सुनावणी होऊन काय निर्णय लागतो यावर शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मदतीचे घोडे अडले आहेत. जिल्ह्यात वाशीम तालुक्यात नऊ, रिसोड आठ, कारंजा आठ, मानोरा सहा, मंगरूळपीर सात, मालेगाव आठ मंडलांमध्ये कमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात खरिपात तीन लाख ५ हजार ३९५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झालेली आहे.

या पिकाचे प्रामुख्याने नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय संयुक्त समितीने २५ टक्के अग्रिम देण्याबाबत अधिसूचना जारी केली. मात्र यावर विमा कंपनीने अपिल दाखल केले. अपिलाचा निर्णय काय येतो व विमा कंपनी अग्रिम देण्याबाबत नेमका कुठला निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

पावसाच्या खंडामुळे काही महसूल मंडलांतील स्थिती सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्याबाबत अधिसूचना काढण्यात आलेली आहे. याविरुद्ध विमा कंपनीने अपिल दाखल केले आहे.  
- आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम
यंदा संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची वेळ आली तर विमा कंपनीने पळवाट काढायला नको. मागील काळात चार-पाच वर्षे या कंपन्यांनी मोठा नफा कमावला. कंपन्या नेहमी फायद्याचाच विचार करतात. दरवर्षी मोबदला द्यायची गरज पडली नव्हती. आता देण्याची वेळ आली तर काढता पाय का घेत आहेत. शेतकऱ्यांचा अधिकार म्हणून मोबदला दिला पाहिजे.
-डॉ. गजानन ढवळे, शेतकरी, शिरपूर जैन, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com