Mango and Cashew Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना पीकविमा परतावा द्या

Cashew Mango Crop Insurance : शासन हवामानावर आधारित फळपीक विमा योजना गेल्या काही वर्षांपासून राबवीत आहे. कोकणातील आंबा आणि काजू या दोन पिकांचा या योजनेत समावेश आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत आंबा, काजू बागांच्या मशागतीचे काम केली जातात. किमान या कालावधीत तरी शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळणे गरजेचे होते. परंतु आजमितीस परतावा मिळण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. गणेशोत्सावापूर्वी विमा परतावा देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यात आंबा, काजू बागायतदारांकडून केली जात आहे.

शासन हवामानावर आधारित फळपीक विमा योजना गेल्या काही वर्षांपासून राबवीत आहे. कोकणातील आंबा आणि काजू या दोन पिकांचा या योजनेत समावेश आहे. यावर्षी जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. यामधील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली असून ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र काजू पिकाखालील आहे.

शेतकऱ्यांनी हे क्षेत्र संरक्षित करण्यासाठी १२ कोटी ८५ लाख रुपये स्वहिस्सा विमा कंपनीकडे भरला आहे. यावर्षी सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानवाढ यांसारख्या कारणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान झाले असून अनेक मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याचा अंदाज आहे. परंतु जोखीम कालावधी संपून अडीच महिन्याचा कालावधी संपला आहे. परंतु विमा परतावा शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झालेल्या नाहीत.

राज्य शासनाकडून राज्याचा हिस्सा विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासन आपला हिस्सा विमा कंपनीला अदा करते.त्यानंतर तीन आठवड्यात विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा परतावा देते. परंतु राज्य आणि केंद्रशासनाने अद्याप विमा कंपनीला आपला हिस्सा अदा केलेला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना परतावा देण्यासाठी कोणत्याही हालचाली विमा कंपनीकडून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आंबा काजूतील मशागतींच्या वेळी किवा गणेशोत्सवासाठी विमा परताव्याची रक्कम मिळेल, या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांना गणेशोत्सवापूर्वी परतावा मिळावा, अशी मागणी केली आहे.

जिल्हा कृषी विभागाकडून विमा कंपनीशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळाला नसल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
- अरुण नातू, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी विभाग, सिंधुदुर्ग
मशागतीच्या वेळी विमा परतावा मिळाला तर आम्हाला किमान दिलासा मिळाला असता, परंतु तो कालावधी देखील संपत चालला आहे. त्यामुळे किमान गणेशोत्सवापूर्वी तरी विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
- सुशांत नाईक, आंबा, काजू बागायतदार, वेतोरे, ता.वेंगुर्ला
या वर्षी ३० टक्के देखील काजू उत्पादन हातात आले नाही. त्यामुळे काजू उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे विमा परतावा तरी वेळेत देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा.
- मंगेश गुरव, काजू उत्पादक शेतकरी, खांबाळे, ता. वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT