Indian Agriculture Success: प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही भारताने धान्य उत्पादनात स्वयंपूर्णता साधत शेती क्षेत्रात जगात आघाडी घेतली आहे. १९५० च्या दशकात देशाला धान्य आयात करावे लागत होते, परंतु नंतर देशाने शेती क्षेत्रात प्रगती करत धान्य उत्पादनात स्वयंपूर्णता साधली, असे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)-केंद्रीय कंदपीक संशोधन संस्थेचे (CTCRI) संचालक डॉ. जी. बैजू यांनी म्हटले आहे..माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी), तिरुवनंतपुरम (केरळ) यांनी 'सीटीसीआरआय'च्या सहकार्याने आयोजित केलेल्या 'वार्ता' कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते..Agriculture Exports Growth: सोलापूर जिल्ह्याची निर्यात पोचली ३ हजार कोटींच्या टप्प्यावर.शेती क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र असून, ते देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) १६.३ टक्के योगदान देते, असेही बैजू यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय शेती क्षेत्राच्या पाच प्रमुख कामगिरीची माहिती दिली. पहिली कामगिरी म्हणजे उत्पादकतेत झालेली उल्लेखनीय वाढ होय..Agriculture Growth: भारतातील शेती क्षेत्रात आर्थिक वाढीस गती देण्याची मोठी क्षमता- निती आयोग .देशातील धान्य उत्पादन १९५०-५१ मध्ये ५०८ लाख टन होते. त्यानंतर पीक लागवडीखालील क्षेत्रात किरकोळ वाढ नोंदवली असतानाही, देशातील उत्पादन २०२५-२६ मध्ये ३,७६५ लाख टनांपर्यंत वाढले. फलोत्पादन उत्पादनाने ३,७०० लाख टनांचा टप्पा पार केला, असे ते म्हणाले..भारताने आता जगातील प्रमुख कृषी निर्यातदार देश म्हणून आघाडी घेतली आहे. देशातून २००१ मध्ये ५५ हजार कोटी रुपयांची शेतमाल निर्यात झाली होती. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ४.३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ नोंदवली. भारताच्या तांदूळ निर्यातीचे मुल्य १.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश बनला असल्याचे बैजू यांनी नमूद केले..धान्य उत्पादनात वाढ कायमविशेष म्हणजे सातत्याने प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असतानाही, देशाने धान्य उत्पादनात गेल्या सात वर्षांत सरासरी ४.४ टक्के इतका वार्षिक वाढीचा दर कायम राखला आहे. यातून हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्याची भारताची क्षमता अधोरेखित होते, याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले..देशाने शाश्वत शेती विकासाच्या दिशेनेही लक्षणीय प्रगती साधली आहे. शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतूद १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. २०१४ मध्ये २७,६६२ कोटी रुपयांची तरतूद होती, असेही ते म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.