Agricultural Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : सिंचनासाठी ‘गिरणे’तून सात आवर्तने मिळणार

Girna Dam Irrigation : गिरणा धरण १९६९ मध्ये पूर्ण झाले. ५३ वर्षांत ते १४ वेळेस पूर्ण भरले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण १०० टक्के भरत असल्याने सिंचनाचे आवर्तन पाण्याच्या उपलब्धतेनुसार व मागणीनुसार एकूण सात वेळा सोडले जातील.

Team Agrowon

Jalgaon News : गिरणा धरण १९६९ मध्ये पूर्ण झाले. ५३ वर्षांत ते १४ वेळेस पूर्ण भरले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण १०० टक्के भरत असल्याने सिंचनाचे आवर्तन पाण्याच्या उपलब्धतेनुसार व मागणीनुसार एकूण सात वेळा सोडले जातील. या वर्षी सिंचानासाठी ३ तर बिगर सिंचनासाठी ४ अशी आवर्तने सोडण्यात येणार आहेत.

त्यातील एक आर्वतन डिसेंबर २०२४ मध्ये सोडण्यात आले. फेब्रुवारी, एप्रिल व जून या महिन्यात सहा वेळा आवर्तने सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी पाणी वापर हा काटकसरीने करून गिरणा प्रकल्पावरील कालवा प्रणालीवरील अनुषंगिक बांधकामे, माती भराव यासह दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावी, गिरणा कालवा प्रणालीची कामे ६० वर्षांपूर्वी झाली असल्याने ‘कालवा प्रणालीचा नूतनीकरणाचा प्रस्ताव’ शासनास सादर करावा, जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाई उपाययोजनांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

३८२ गावांना लाभ

जिल्हास्तरीय कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून, यावर १३८ गावे अवलंबून आहेत. बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.

अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील विभागाने सुचविल्याप्रमाणे पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता देण्यात करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी अधीक्षक अभियंता, प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण संतोष भोसले, तुषार महाजन, आर. टी. पाटील, रवींद्र ठाकूर, उपकार्यकारी अभियंता मनोहर चौधरी, सिद्धार्थ पाटील, उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

सिंचन, बिगरसिंचन पाणी वापर

गिरणा प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालामध्ये सिंचनाव्यतिरिक्त कुठल्याही बाबींसाठी पाणी वापराची तरतूद केलेली नाही. तथापि बदलत्या परिस्थितीनुसार बिगर सिंचनासाठी शासनाने वेळोवेळी मंजुऱ्या दिलेल्या आहेत.

गिरणा प्रकल्पा अंतर्गत पिण्यासाठी अवलंबून असणाऱ्या संस्थामध्ये मालेगाव महापालिका, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ योजनांचा समावेश असून, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व एरंडोल तालुक्तायातील १५४ गावांचाही समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT