Ginger Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Conference : कन्नड येथे उद्या आले परिषदेचे आयोजन

Ginger Market : सहकार परिषद, ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आता रविवारी (ता. १८) कन्नड येथे आले परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : सहकार परिषद, ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आता रविवारी (ता. १८) कन्नड येथे आले परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच राज्यात अशा प्रकारे आले परिषद घेतली जात असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सदस्य भाऊसाहेब थोरात यांनी दिली. या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत. इतरही प्रदेश कारखान्यातील नेते मंडळी या परिषदेत सहभागी होणार असल्याचे श्री. थोरात म्हणाले.

आले परिषदेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आले उत्पादक भागातील शेतकऱ्यांसह सोलापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांतील तसेच महाराष्ट्रातील इतर भागातील ही साधारणतः ५००० आले उत्पादक सहभागी होतील, अशी आशा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी व्यक्त केली.

या परिषदेमध्ये आल्यासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या जवळपास ११ मुद्द्यांवर प्रामुख्याने चिंतन होणार आहे. सोबतच परिषदेत सर्व मुद्द्यांना अनुसरून ठरावही घेतले जातील. घेतलेल्या ठरावासंदर्भात शासनाला अवगत करण्यासाठी स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ कृषिमंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांसंदर्भात शासन निर्णय घेण्याविषयी अवगत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. साबळे म्हणाले.

आले परिषदेचे प्रमुख विषय

- आले संशोधन केंद्र लवकरात लवकर उभारावे.

- आल्याच भौगोलिक मानांकन करण्यात यावे.

- आले पिकाला विमा संरक्षणात स्थान मिळावे.

- महसूल दप्तरी आले पीकपेरा नोंद घ्यावी.

- आले पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग कन्नड परिसरात वाढण्यास चालना द्यावी.

- आले विक्रीसाठी बाजार समितीमार्फत खरेदी परवाने व बँक गॅरंटी देणाऱ्या सक्षम व्यापाऱ्याकडे विक्री व्हावी. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण असावे.

- आल्याचे चांगल्या प्रतीचे बियाणे शासनामार्फत त विनामूल्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.

- आले व्यापाऱ्यांनी सौदे करताना मिश्र पद्धतीने करावे, नवे जुने वेगळे खरेदी करू नये.

सरकारच्या आयात निर्यात संबंधीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे तो कर्ज भरू शकत नाही. ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी या संदर्भात घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील लाखभर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी करणारे व हमीभाव गॅरंटी कायदा संसदेत पारित करण्याची मागणी लेखी घेतली जाईल, असे स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT