Advance Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळवून द्या

Crop Insurance : शेतकरी मंडळांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सततच्‍या पावसाने पिकांचे नुकसान

Team Agrowon

Akola News : अकोला ः यंदा सततच्‍या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी मूर्तीजापूर तालुक्यातील विविध शेतकरी मंडळांनी केली आहे. या विषयावर सोमवारी (ता. २३) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. मूर्तीजापूर तालुक्यात खरीप पीक परिस्थितीचा वास्तववादी अहवाल तहसीलदार शिल्पा बोबडे व तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांनी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

त्याला अनुसरून २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांच्या नेतृत्वात मुन्ना नाईकनवरे, विकी तिवारी, हरीदास फुकें, संजय वानखडे, अरुण बोंडे यांनी भेटून चर्चेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यंदा सतत पाऊस झाला. त्यातच काही ठिकाणी ढगफुटी, अतिवृष्टी झाली. शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांची वाढ खुटली होती. त्यामुळे कीड आणि रोगांचाही प्रादुर्भाव झाल्याने नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढला. सोयाबीनला शेंगाच लागलेल्या नाहीत. काही ठिकाणी सोयाबीनला अतिशय कमी प्रमाणात शेंगा लागल्या. त्यातच ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळाला नाही.

कापूस पिकाला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्यामध्ये तण वाढले. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाला. शेतीच्या खर्चासोबतच प्रपंचाचा खर्च कसा भागवावा या विवंचनेत शेतकरी सापडला. काहींनी कापूस व सोयाबीन पिकांवर रोटाव्हेटर चालवून पिके मोडली. पेरणी, आंतर मशागत, खते, बियाणे, कीटकनाशकांवर १५ ते २० हजारांचा खर्च करूनही हातात काहीच लागले नाही. एका महिन्यात हाती येणाऱ्या पिकातून खर्चही निघणार नसल्यामुळे शासकीय मदत व पीकविम्यावर शेतकरी लक्ष लावून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ४ ते नऊ सप्टेंबरपर्यंत मूर्तीजापूर येथे राजू वानखडे यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते.

अद्याप सरकारी यंत्रणेने नुकसानीची पाहणी केली नाही. मदतीबाबतचा कोणताही प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. या सर्व परिस्थितीची जाणीव शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करून दिली. यावर जिल्हाधिकऱ्यांनी गुरुवारी (ता. २६) मुंबई येथे पालकमंत्र्यांनी सभा बोलावली असून त्यामध्ये मी हा मुद्दा पालकमंत्र्यांच्या समोर मांडणार असल्याची माहिती दिली. या निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, जनमंचाचे अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे, आंतरभारतीचे सचिव प्रमोद राजंदेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे, न्यूयंग क्लब फार्मर्स ग्रुपचे मुन्ना नाईकनवरे, यंग बॉईज क्लबचे अध्यक्ष पंकज कांबे, विकी तिवारी, हरिदास फुके, अरुण बोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT