Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Demands : संग्रामपूरला फळपीक विमा, गारपिटीची मदत द्यावी

Team Agrowon

Buldhana News : ‘‘संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा आंबिया बहार फळ पीकविमा व फेब्रुवारीत झालेल्या गारपीट नुकसानाची मदत लवकर द्यावी, अशी मागणी तालुक्यातील सोनाळा, बावनबीर येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अचानक वादळवारा व पाऊस आला होता. तसेच गारपीटही झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा, मका, भुईमूग, कांदा आदी पिके पेरलेली होती. तेव्हा पिकांची स्थिती चांगली होती.

पिके चांगल्या प्रमाणात होतील, अशी अपेक्षा होती. पिके पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन, उसनवारी करून कृषी केंद्रांवरून बियाणे, खते घेऊन पेरणी केली. मात्र, फेब्रुवारीत अचानक वादळवारा, पाऊस, गारपीट झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. झालेल्या नुकसानाची राज्य सरकारने दखल घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

राज्य सरकारने मदतही घोषित केली होती. मात्र, ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. तसेच सोनाळा, बावणबीर या परिसरात संत्रा उत्पादक जास्त प्रमाणात आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी अंबिया बहारचा फळ पीकविमा काढला होता.

त्या विम्याचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

Vegetable Market : गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT